शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराजस्व अभियान’मुळे महसुली कामे लागताहेत मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:50 IST

वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक  करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून,  सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी  लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली  असून, ३१ जुलै २0१८ पर्यंत  या अंतर्गत प्रशासनाने कुठली कामे  करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारित केले आहेत.

ठळक मुद्देअभियानाला दिले विस्तारित स्वरूपवर्षभर विविध उपक्रमांची आखणी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक  करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून,  सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी  लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली  असून, ३१ जुलै २0१८ पर्यंत  या अंतर्गत प्रशासनाने कुठली कामे  करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारित केले आहेत.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांचा दैनंदिन  कामकाजासंदर्भात महसूल प्रशासनाशी थेट संबंध येतो. त्यासाठी पूर्वी  सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविले जायचे. दरम्यान, महसूल  प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या  दृष्टीने १ ऑगस्ट २0१५ पासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत  आहे. दरम्यान, १ ऑगस्ट २0१७ पासून अधिक विस्तारित स्वरूपात  हे अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावाच्या  भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे  आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत  सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत  क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणी पुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढय़ांवर झालेल्या अ ितक्रमणाची माहिती संकलित करणे यांसह इतरही विविध उपक्रम  राबविण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत.

महाराजस्व अभियानातील लोकाभिमुख घटक- विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करणे- विस्तारित समाधान योजना राबविणे- महसूल अधिकार्‍यांकडे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित  असणारे सर्व अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे.- एका महिन्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व  त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे- ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करुन देणे- भूसंपादन केल्याप्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर  अद्ययावत करणे- गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद,  शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे आदी  लोकाभिमुख घटकांचा महाराजस्व अभियानात समावेश करण्यात  आलेला आहे.

महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. चालू  वर्षाच्या १ ऑगस्टपासून पुढील वर्षाच्या ३१ जुलै २0१८ पर्यंत पुन्हा  ही मोहीम राबविली जात असून, या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची  महसूल विभागाशी संबंधित कामे निकाली काढण्य जिल्हा  प्रशासन पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्या  आहेत.- शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम