शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

पीक विमा योजनेस बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

राज्य शासनाने यंदा खरीप हंगामात पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यातही २८ जूनपासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली, ...

राज्य शासनाने यंदा खरीप हंगामात पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यातही २८ जूनपासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली, तर सुरुवातीला १५ जुलैपर्यंतचीच मुदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यात सहभागी होता आले नाही. त्यामुळे शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. या मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्यातील २ लाख २ हजार ५२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवत विविध पिकांना विमा कवच दिले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ६८ हजार ३४३, तर १ लाख ३३ हजार ७०९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. अर्थात कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट होत आहे.

------------

योजना ऐच्छिक केल्याने प्रतिसाद घटला

पूर्वी पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची होती. शासनाच्या या धोरणामुळे कर्जदार शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे शासनाने सर्वच शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली. योजनेच्या निकषांत बदल केल्यानंतर मात्र कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

-------------

कोट: पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच आहे. नुकसान झालेले आणि निकषानुसार लाभासाठी पात्र कोणताही शेतकरी विम्याच्या फायद्यापासून वंचित राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेवर शंका घेणे चुकीचेच आहे. यंदा पुरेसा वेळ मिळाला नसल्याने या योजनेत कमी प्रमाणात शेतकरी सहभागी होऊ शकले; परंतु अद्याप सहभागी शेतकऱ्यांची अंतिम संख्या प्राप्त होणे बाकी आहे.

- शंकरराव तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

---------

योजनेत सहभागी एकूण शेतकरी- २,०२,०५२

योजनेत सहभागी कर्जदार शेतकरी- ६८,३४३

योजनेत सहभागी बिगर कर्जदार शेतकरी-१,३३, ७०९

----------