शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त

By admin | Updated: May 19, 2017 19:35 IST

रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील एटीएम बंद असल्याने आणि १० ते १५ हजारापेक्षा जास्त रकमेचा ह्यविड्रॉलह्ण होत नसल्याने सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जाहिर केला होता. सुरूवातीच्या दोन महिन्यापर्यंत नोटाबंदीची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसली. जानेवारीच्या मध्यानंतर रोकड टंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निवळला होता. एटीएममध्येही पैसा राहू लागला. मात्र, २० एप्रिलनंतर रोकड टंचाईची झळ पुन्हा नागरिकांना बसू लागली. रोकड टंचाईचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. रिसोड शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक या प्रमुख बँकांसह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अर्बन व खासगी सहकारी बँका आहेत.द दोन एटीएमचा अपवाद वगळता उर्वरीत एटीएम पैशाअभावी बंद असल्याचे दिसून येते. बँकांमधूनदेखील १५ हजारापेक्षा अधिक रकमेचा विड्रॉल मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: खरिप हंगाम तोंडावर आलेला असताना, शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम बँकेतून काढणे कठीण होत आहे. यामुळे मशागतीची कामे करणाऱ्या मजूरांना मजूरी देण्यासाठी तसेच बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होईल, अशी माहिती २५ दिवसांपूर्वी जिल्हा अग्रणी बँक प्रशासनाने केली होती. मात्र, अद्यापही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने रिसोड शहरातील एटीएम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.