शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त

By admin | Updated: May 19, 2017 19:35 IST

रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील एटीएम बंद असल्याने आणि १० ते १५ हजारापेक्षा जास्त रकमेचा ह्यविड्रॉलह्ण होत नसल्याने सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जाहिर केला होता. सुरूवातीच्या दोन महिन्यापर्यंत नोटाबंदीची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसली. जानेवारीच्या मध्यानंतर रोकड टंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निवळला होता. एटीएममध्येही पैसा राहू लागला. मात्र, २० एप्रिलनंतर रोकड टंचाईची झळ पुन्हा नागरिकांना बसू लागली. रोकड टंचाईचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. रिसोड शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक या प्रमुख बँकांसह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अर्बन व खासगी सहकारी बँका आहेत.द दोन एटीएमचा अपवाद वगळता उर्वरीत एटीएम पैशाअभावी बंद असल्याचे दिसून येते. बँकांमधूनदेखील १५ हजारापेक्षा अधिक रकमेचा विड्रॉल मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: खरिप हंगाम तोंडावर आलेला असताना, शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम बँकेतून काढणे कठीण होत आहे. यामुळे मशागतीची कामे करणाऱ्या मजूरांना मजूरी देण्यासाठी तसेच बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होईल, अशी माहिती २५ दिवसांपूर्वी जिल्हा अग्रणी बँक प्रशासनाने केली होती. मात्र, अद्यापही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने रिसोड शहरातील एटीएम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.