शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रकल्पांचा जलसाठा घसरला !

By admin | Updated: April 18, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पात १८ तर शंभर लघुप्रकल्पात १५ टक्के जलसाठा.

वाशिम : पावसाळय़ात झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी आधीच कमी होती. गत दोन महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पा तळीत वाढ न होता शेतकर्‍यांचे नुकसानच मोठय़ा प्रमाणात झाले आहे. प्रकल्पांमध्ये व धरणामध्येही जलसाठा कमी असल्याने जिल्हय़ात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी महिन्यात मध्यम प्रकल्पात २५.९६ टक्के जलसाठा होता आजच्या घडीला (१५ एप्रिल) तो १८.४१ टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यातील १0३ मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठा पाहता पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, काही भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम जलाशय पातळी आहे, तर १४ प्रकल्प कोरडे ठण्ण पडले आहेत. २९ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम पातळीच्या खाली गेली आहे. केवळ एक मध्यम व ४ लघुप्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा ५0 टक्केपेक्षा जास्त असल्याची लघू पाटबंधारे विभाग वाशिम जलाशय पातळी अहवालात नोंद आहे. जिल्हय़ात असलेल्या ३ मोठय़ा प्रकल्पामध्ये आजच्या घडीला १७.७0 दलघमी जलसाठा आहे तर १00 लघू प्रकल्पामध्ये ३५.८८ दलघमी असा एकूण ५३.५८ टक्के जलसाठा आहे. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्पापैकी एकबुर्जी प्रकल्पात १९.३0, सोनल प्रकल्पात २७.९६ तर अडाण प्रकल्पात १५.८५ टक्के तर १00 लघू प्रकल्पा पेैकी २८ प्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. प्रकल्पात जलसाठय़ांची स्थिती दयनीय असल्याने पाणीटंचाईची दाट शक्यता दिसून येत आहे. भूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्या तील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ आजपर्यंत १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गावागावात पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.