शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

प्रकल्पांचा जलसाठा घसरला !

By admin | Updated: April 18, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पात १८ तर शंभर लघुप्रकल्पात १५ टक्के जलसाठा.

वाशिम : पावसाळय़ात झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी आधीच कमी होती. गत दोन महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पा तळीत वाढ न होता शेतकर्‍यांचे नुकसानच मोठय़ा प्रमाणात झाले आहे. प्रकल्पांमध्ये व धरणामध्येही जलसाठा कमी असल्याने जिल्हय़ात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी महिन्यात मध्यम प्रकल्पात २५.९६ टक्के जलसाठा होता आजच्या घडीला (१५ एप्रिल) तो १८.४१ टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यातील १0३ मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठा पाहता पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, काही भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम जलाशय पातळी आहे, तर १४ प्रकल्प कोरडे ठण्ण पडले आहेत. २९ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम पातळीच्या खाली गेली आहे. केवळ एक मध्यम व ४ लघुप्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा ५0 टक्केपेक्षा जास्त असल्याची लघू पाटबंधारे विभाग वाशिम जलाशय पातळी अहवालात नोंद आहे. जिल्हय़ात असलेल्या ३ मोठय़ा प्रकल्पामध्ये आजच्या घडीला १७.७0 दलघमी जलसाठा आहे तर १00 लघू प्रकल्पामध्ये ३५.८८ दलघमी असा एकूण ५३.५८ टक्के जलसाठा आहे. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्पापैकी एकबुर्जी प्रकल्पात १९.३0, सोनल प्रकल्पात २७.९६ तर अडाण प्रकल्पात १५.८५ टक्के तर १00 लघू प्रकल्पा पेैकी २८ प्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. प्रकल्पात जलसाठय़ांची स्थिती दयनीय असल्याने पाणीटंचाईची दाट शक्यता दिसून येत आहे. भूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्या तील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ आजपर्यंत १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गावागावात पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.