शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गरज १२00 हेक्टरची; भूसंपादन केवळ सात हेक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:25 IST

‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे;  मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित ११९३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाला अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग५४ पैकी १४ गावांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण

सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे;  मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित ११९३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाला अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७१0 किलोमीटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ९८ किलोमीटरचे अंतर पार करून ५४ गावांना छेदून जाणार आहे. त्यासाठी २२00 शेतकर्‍यांकडून सुमारे १२00 हेक्टर जमिन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार, १ ऑगस्ट रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरळ खरेदीने भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. त्या दिवशी पाच शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून संबंधितांना तत्काळ धनादेश वितरित करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविली जात असताना त्यास अपेक्षित यश अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या ४0 दिवसांत केवळ ९ शेतकर्‍यांच्या खरेदी झाल्या असून, एकूण ७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण होऊ शकले आहे. असे असले तरी येत्या आठवड्यापासून या प्रक्रियेस गती देऊन सप्टेंबरअखेर आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के भूसंपादन झालेले असेल, असा दावा उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी केला.

५४ पैकी १४ गावांच्या मूल्यांकनास मंजुरी!समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधील १२00 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ‘रेडी रेकनर’नुसार जमिनींचे दर निश्‍चित करण्यासाठी आतापर्यंत ५४ गावांपैकी १४ गावांच्या मूल्यांकनास जिल्हास्तरीय समितीने मंजुरात दर्शविली आहे. त्यात अलीर्मदापूर, पिंप्री मोखड, कतनापूर, इमामपूर, खेर्डी, बग्गी, निंबा जहागीर, आखतवाडा, देवचंडी, मजलापूर, एडशी, शेंदुरजना मोरे, अनसिंग, वरदरी खु. या गावांचा समावेश आहे. संबंधित गावांमध्ये आतापर्यंत १४ शेतकर्‍यांच्या जमिनींच्या खरेदी आटोपल्या असून, त्यांना २ कोटी ३५ लाख रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

समृद्धी महामार्गाकरिता जमिनी देण्यास शेतकर्‍यांचा पूर्वीसारखा विरोध आता राहिलेला नाही. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस आता निश्‍चितपणे गती मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर महामार्गासाठी आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के जमिनीचे संपादन करण्याचे उद्दिीट प्रशासनाने बाळगले आहे.- सुनील माळी,उपजिल्हाधिकारी, वाशिम.