वाशिम आगारातून गेल्या तीन दिवसांपासून वाशिम-अकोला ही बस सकाळी ९ वाजता व दुपारी ४ वाजता सोडण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यातील रिसोड व कारंजा लाड येथेही दैनंदिन फेरी सुरू करण्यात आली आहे. वाशिम आगारातून येत्या १ जूनपासून वाशिम-अमरावती ही बसफेरी सुरू करण्यात येणार आहे. त्याची वेळ दैनंदिन सकाळी ८ वाजता व दुपारी ४ वाजताची राहणार आहे. तसेच अमरावती आगाराची वाशिम-अमरावती ही बस सकाळी १०:३० वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता सोडली जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख इलामे यांनी दिली.
..................
एस.टी. प्रवासात मास्क आवश्यक
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे एस.टी.च्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी ४० पेक्षा अधिक प्रवासी एस.टी.मध्ये बसविता येणार नाहीत. याशिवाय प्रत्येक प्रवाशाला तोंडाला मास्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर ठेवून कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
पाच दिवसांत पाच हजारांचे उत्पन्न
वाशिम आगारातून २५ मेपासून मोजक्या बस फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यास प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत या माध्यमातून केवळ पाच हजारांच्या आसपास उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख विनोद इलामे यांनी दिली.