शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजुरा ग्रामपंचायतीने उचलला स्वच्छतेचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार ...

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार केले आहेत. या उकिरड्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव निर्माण होतो. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, शिवाय गावात प्रवेश करताच घाण दिसत असल्याने, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यशोदाबाई रवणे यांनी ग्रामपंचायतच्या पहिल्याच सभेत गावाच्या मुख्य रस्त्यालगतचे सर्व उकिरडे उचलून गाव स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय सभेत उपस्थित केला. त्याला ग्रा.पं. सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, आरती प्रकाश बोरजे, हुस्नाबी अलियारखॉ पठाण यांच्यासह उपस्थित सदस्यांनी समर्थन देत, एकमुखाने ठराव पारित केला. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उकिरडे करणाऱ्यांना ४ मार्च रोजी रीतसर नोटीस बजावून तत्काळ उकिरडे हटविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

---------

कोट: जनतेच्या आरोग्यासह गावाच्या सौंदर्यीकरण्याच्या दृष्टीने उकिरडे उचलून घाण साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचा ठराव पारित करून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.

यशोदाबाई रवणे, प्रभारी सरपंच