शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

राजुरा ग्रामपंचायतीने उचलला स्वच्छतेचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार ...

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार केले आहेत. या उकिरड्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव निर्माण होतो. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, शिवाय गावात प्रवेश करताच घाण दिसत असल्याने, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यशोदाबाई रवणे यांनी ग्रामपंचायतच्या पहिल्याच सभेत गावाच्या मुख्य रस्त्यालगतचे सर्व उकिरडे उचलून गाव स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय सभेत उपस्थित केला. त्याला ग्रा.पं. सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, आरती प्रकाश बोरजे, हुस्नाबी अलियारखॉ पठाण यांच्यासह उपस्थित सदस्यांनी समर्थन देत, एकमुखाने ठराव पारित केला. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उकिरडे करणाऱ्यांना ४ मार्च रोजी रीतसर नोटीस बजावून तत्काळ उकिरडे हटविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

---------

कोट: जनतेच्या आरोग्यासह गावाच्या सौंदर्यीकरण्याच्या दृष्टीने उकिरडे उचलून घाण साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचा ठराव पारित करून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.

यशोदाबाई रवणे, प्रभारी सरपंच