शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा ग्रामपंचायतीने उचलला स्वच्छतेचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार ...

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार केले आहेत. या उकिरड्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव निर्माण होतो. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, शिवाय गावात प्रवेश करताच घाण दिसत असल्याने, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यशोदाबाई रवणे यांनी ग्रामपंचायतच्या पहिल्याच सभेत गावाच्या मुख्य रस्त्यालगतचे सर्व उकिरडे उचलून गाव स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय सभेत उपस्थित केला. त्याला ग्रा.पं. सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, आरती प्रकाश बोरजे, हुस्नाबी अलियारखॉ पठाण यांच्यासह उपस्थित सदस्यांनी समर्थन देत, एकमुखाने ठराव पारित केला. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उकिरडे करणाऱ्यांना ४ मार्च रोजी रीतसर नोटीस बजावून तत्काळ उकिरडे हटविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

---------

कोट: जनतेच्या आरोग्यासह गावाच्या सौंदर्यीकरण्याच्या दृष्टीने उकिरडे उचलून घाण साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचा ठराव पारित करून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.

यशोदाबाई रवणे, प्रभारी सरपंच