शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काजळेश्वर शिवारात निरभ्र वातावरणामुळे रब्बी पिके बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST

काजळेश्वर : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन रब्बी पिके संकटात सापडली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरण निरभ्र ...

काजळेश्वर : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन रब्बी पिके संकटात सापडली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून, थंडीचाही जोर वाढत असल्याने रब्बी पिके बहरू लागली आहेत. प्रामुख्याने पोषक वातावरणामुळे गहू पीक चांगलेच जोमात असल्याचे चित्र काजळेश्वर शिवारात दिसत आहे.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरात गत आठवडाभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकासह इतर पिकांवर परिणाम होऊ लागला होता. त्यात हरभरा पिकांवर मर रोगासह घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला, तर मका आणि ज्वारी पिकावरही खोड कीड, मूळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानाची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. तथापि, आठवडाभरानंतर वातावरण चार दिवसांपासून निरभ्र झाल्याने पिकांच्या स्थितीत सुधारणा होत असून, काजळेश्वर शिवारात गहू पीक चांगले बहरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

===Photopath===

100121\10wsm_5_10012021_35.jpg

===Caption===

 निरभ्र वातावरणामुळे रब्बी पिके बहरली