शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काजळेश्वर शिवारात निरभ्र वातावरणामुळे रब्बी पिके बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST

काजळेश्वर : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन रब्बी पिके संकटात सापडली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरण निरभ्र ...

काजळेश्वर : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन रब्बी पिके संकटात सापडली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून, थंडीचाही जोर वाढत असल्याने रब्बी पिके बहरू लागली आहेत. प्रामुख्याने पोषक वातावरणामुळे गहू पीक चांगलेच जोमात असल्याचे चित्र काजळेश्वर शिवारात दिसत आहे.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरात गत आठवडाभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकासह इतर पिकांवर परिणाम होऊ लागला होता. त्यात हरभरा पिकांवर मर रोगासह घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला, तर मका आणि ज्वारी पिकावरही खोड कीड, मूळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानाची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. तथापि, आठवडाभरानंतर वातावरण चार दिवसांपासून निरभ्र झाल्याने पिकांच्या स्थितीत सुधारणा होत असून, काजळेश्वर शिवारात गहू पीक चांगले बहरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

===Photopath===

100121\10wsm_5_10012021_35.jpg

===Caption===

 निरभ्र वातावरणामुळे रब्बी पिके बहरली