शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

नैसर्गिक संकटांनी गतवर्षी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविल्यानंतर यंदाच्या वर्षीही सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांवर होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ ...

नैसर्गिक संकटांनी गतवर्षी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविल्यानंतर यंदाच्या वर्षीही सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांवर होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी आणि मक्याचे पीक बहरत असताना या वातावरणामुळे या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यात प्रामुख्याने हरभरा पीक संकटात सापडले असून, या पिकावर विविध किडींसह मररोगाचा प्रादुर्भावही दिसू लागला आहे. त्यामुळे पिकाची फुले व घाटे गळून पडत आहेत. शिवाय गहू, मका आणि रब्बी ज्वारी या तृणवर्गीय पिकांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकरीवर्गात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच गत खरीप हंगामातील नुकसानाच्या मदतीपासून आणि पीकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित असताना आता रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

===Photopath===

050121\05wsm_1_05012021_35.jpg

===Caption===

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात