शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:15 IST

वाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यातील मिर्झापूर (ता. मालेगाव), पळसखेड (ता. रिसोड) या सिंचन प्रकल्पांमुळे तीन गावांमधील ४६६ कुटूंब १० वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सन २००५-०६ मध्ये उभारण्यात आलेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पामुळे मालेगाव तालुक्यातील पांगरखेड हे गाव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून तेथील १६९ कुटूंब यामुळे बाधीत झाली. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्पही २००६-०७ मध्ये उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्राखाली गेले असून या गावातील ४९ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तसेच बिबखेड हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली असून गावातील २४८ कुटूंब बाधीत झाली आहेत. सदर गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती, पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम, विद्यूतीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्याची कामे प्रलंबित आहेत. 

सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसीत मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेड यासह इतर गावांमध्येही विकासकामांसाठी लागणाºया निधीस शासनाने मंजूरात प्रदान केली. लवकरच प्रलंबित असलेली तथा रखडलेली कामे पूर्ण केली जातील. - शिवाजी जाधवकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम