शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक ...

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली .मात्र अनेक गावामध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलक सुद्धा नसल्याने वाचकात गावात वाचनालय आहे की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अनेक वाचनालयात नियमित वर्तमानपत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन चार वर्तमानपत्र महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमान पत्रातून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित रहावे लागत आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमान पत्र वाचनापासून वंचित रहावे लागत आहे.

-----------------

उंबर्डा येथे शांतता समितीची बैठक

उंबर्डा बाजार : स्थानिक पोलीस चौकीत गणेश उत्सवानिमित्त कारंजाचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल यांचे उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस पाटील उमेश देशमुख यांनी केले. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक पटेल यांनी मार्गदर्शन केले. संचलन जमादार विलास गायकवाड तर आभार विनोद राठोड यांनी मानले . या बैठकीला मुरलीधर उगले , अजित देशमुख , वहिदभाई , विनोद चव्हाण, बाळू चव्हाण, गौरव देशमुख, धनराज इंगोले ( टेलर ) यांचे सह गजानन लायबर उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पिंपळे , महल्ले आदींनी परिश्रम घेतले.

----

स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था झाली असून स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

येवता ते यावर्डी या रस्त्यावर स्मशानभूमी असून काही महिन्यांपूर्वी खडीकरण झालेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी शेडची सुद्धा दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी टपकत असल्याने शेडचा निवारा निकामी ठरत आहे.

तरी संबंधित विभागाने येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.