शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक ...

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली .मात्र अनेक गावामध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलक सुद्धा नसल्याने वाचकात गावात वाचनालय आहे की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अनेक वाचनालयात नियमित वर्तमानपत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन चार वर्तमानपत्र महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमान पत्रातून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित रहावे लागत आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमान पत्र वाचनापासून वंचित रहावे लागत आहे.

-----------------

उंबर्डा येथे शांतता समितीची बैठक

उंबर्डा बाजार : स्थानिक पोलीस चौकीत गणेश उत्सवानिमित्त कारंजाचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल यांचे उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस पाटील उमेश देशमुख यांनी केले. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक पटेल यांनी मार्गदर्शन केले. संचलन जमादार विलास गायकवाड तर आभार विनोद राठोड यांनी मानले . या बैठकीला मुरलीधर उगले , अजित देशमुख , वहिदभाई , विनोद चव्हाण, बाळू चव्हाण, गौरव देशमुख, धनराज इंगोले ( टेलर ) यांचे सह गजानन लायबर उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पिंपळे , महल्ले आदींनी परिश्रम घेतले.

----

स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था झाली असून स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

येवता ते यावर्डी या रस्त्यावर स्मशानभूमी असून काही महिन्यांपूर्वी खडीकरण झालेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी शेडची सुद्धा दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी टपकत असल्याने शेडचा निवारा निकामी ठरत आहे.

तरी संबंधित विभागाने येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.