शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक ...

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली .मात्र अनेक गावामध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलक सुद्धा नसल्याने वाचकात गावात वाचनालय आहे की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अनेक वाचनालयात नियमित वर्तमानपत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन चार वर्तमानपत्र महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमान पत्रातून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित रहावे लागत आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमान पत्र वाचनापासून वंचित रहावे लागत आहे.

-----------------

उंबर्डा येथे शांतता समितीची बैठक

उंबर्डा बाजार : स्थानिक पोलीस चौकीत गणेश उत्सवानिमित्त कारंजाचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल यांचे उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस पाटील उमेश देशमुख यांनी केले. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक पटेल यांनी मार्गदर्शन केले. संचलन जमादार विलास गायकवाड तर आभार विनोद राठोड यांनी मानले . या बैठकीला मुरलीधर उगले , अजित देशमुख , वहिदभाई , विनोद चव्हाण, बाळू चव्हाण, गौरव देशमुख, धनराज इंगोले ( टेलर ) यांचे सह गजानन लायबर उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पिंपळे , महल्ले आदींनी परिश्रम घेतले.

----

स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था झाली असून स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

येवता ते यावर्डी या रस्त्यावर स्मशानभूमी असून काही महिन्यांपूर्वी खडीकरण झालेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी शेडची सुद्धा दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी टपकत असल्याने शेडचा निवारा निकामी ठरत आहे.

तरी संबंधित विभागाने येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.