शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यातील पाणी जिल्ह्याला उपलब्ध करून द्या; ग्रामपंचायतींकडून ठराव

By सुनील काकडे | Updated: December 24, 2023 14:04 IST

किमान २०० दलघमी पाणी मिळण्याची मागणी

सुनील काकडे

वाशिम : उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्याचा कुठलाच वापर, कोणत्याच प्रयोजनासाठी केला जात नाही. त्यातील किमान २०० दलघमी पाणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमध्ये सोडून पाण्याची गरज पूर्ण करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंबंधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ठराव घेणे सुरू झाले आहे.

जलहक्क स्वयंसेवी संघटनेचे सचिन कुळकर्णी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी नोंदविली होती. त्याची दखल घेत ११ नोव्हेंबर रोजी गडकरींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याची सूचना केली. आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी देखील याच विषयावर ठराव घेणे सुरू केले आहेत. शासन त्याची कधी दखल घेणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.पाणी उपलब्धतेची समस्या ऐरणीवर

वाशिम जिल्हा हा गोदावरी आणि तापी खोऱ्याच्या जलविभाजकावर (डिव्हाईड लाईन किंवा वाॅटर शेड रिज) येतो. त्यामुळे भाैगोलिकदृष्ट्या मोठे सिंचन प्रकल्प जिल्ह्यात कुठेही उभारता येणे अशक्य आहे. याशिवाय नव्या सिंचन प्रकल्पांसाठी पाणी उपलब्धतेची देखील प्रमुख समस्या आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेती व्यवसाय धोक्यात सापडत आहे.६७९ दलघमीची परवानगी; जिल्ह्याला हवे २०० दलघमी

गोदावरी लवादानुसार निम्न पैनगंगा धरण स्थळापर्यंत पाणी वापराचा संपूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे. याशिवाय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला प्रस्तावित चिंचोली संगम व दिगडी उच्च पातळी येथून ६७९ दलघमी पाणी उर्ध्व पैनगंगा धरणात टाकण्यासाठी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यातून केवळ २०० दलघमी पाणी उर्ध्व पैनगंगा धरणात आणि तेथून जिल्ह्यातील ११ बॅरेजेसच्या माध्यमातून प्रस्तावित स्थळी वळते करावे, अशी मागणी होवू लागली आहे.शेकडो शेतकऱ्यांची शेती येणार सिंचनाखाली

उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यातील २०० दलघमी पाणीसाठा जिल्ह्याला मिळाल्यास प्रामुख्याने शेकडो शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणे शक्य होणार आहे. याशिवाय अन्य प्रयोजनासाठी देखील पाणी उपलब्ध होणार असल्याने मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.कोंडाळा, कोळगाव ग्रामपंचायतीचा ठराव

जिल्ह्यातील कोंडाळा महाली (ता.वाशिम) आणि कोळगाव (ता.मालेगाव) या दोन ग्रामपंचायतींनी यासंदर्भात ठराव घेतला आहे. इतरही सात ते आठ ग्रामपंचायती आठवडाभरात ठराव घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली.