शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गाव तलावाचा प्रश्न रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक ...

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक तरी तलाव व्हावा म्हणून १७ वर्षांपासून गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, ग्रामस्थांच्या पदरात आश्वासनांची खैरात पडण्यापलीकडे काहीही पडले नाही. गावाच्या सीमावर्ती भागात एकही तलाव नाही. गाव परिसरात तलावच नसल्याने येथील नदीनाल्याचे पाणी वाहून जाते. या ठिकाणी 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा एकही उपक्रम राबविण्यात आलेला नाही. गत काही वर्षांपासून गावकऱ्यांची तहान टँकरद्वारा भागविली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण होतो. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई निकाली काढण्यासाठी व शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी लघू सिंचन प्रकल्प, गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते तब्बल १७ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु, शासन व प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने गाव तलावाचा प्रश्न निकाली निघू शकला नाही.