शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

‘नाफेड’च्या बारदाना तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम!

By admin | Updated: April 3, 2017 02:23 IST

वाशिम जिल्ह्यात नाफेडची खरेदी १0 दिवसांपासून बंद

वाशिम, दि. २- पूर्वी साठवणुकीच्या अडचणीमुळे अडचणीत आलेली नाफेडची तूर खरेदी आता बारदान्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील नाफेडची खरेदी बंद असून, आता मार्च एंडिंगच्या ताळेबंदासाठी बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांची खरेदीही बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा तुरीच्या पेर्‍यात वाढ झाली आणि उत्पादनही बर्‍यापैकी झाले. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली होती. तथापि, बाजारात हमीदराहून कमी दराने व्यापार्‍यांकडून तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी निराश असताना नाफेडने खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकर्‍यांना आधार मिळाला खरा; परंतु आठ-आठ दिवस बाजारात थांबूनही नाफेडच्या केंद्रावर शेतकर्‍यांच्या मालाची मोजणी होत नव्हती. त्यातच साठवणुकीसाठी जागा नसल्याने फेब्रुवारी महिन्यात काही दिवस खरेदी थांबली. वखार महामंडळाची गोदामे भरली आणि खासगी गोदामे भाड्याने मिळत नसल्याने अखेर वाशिम जिल्ह्यात खरेदी केलेली तूर अकोला येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्याच्या निर्णयानुसार खरेदी सुरू झाली. काही दिवस खरेदी झाली असतानाच आता बारदाना नसल्याने नाफेडची खरेदी बंद पडली आहे. मंगरुळपीर येथे फूड कॉर्पोरेशन ऑफइंडियाने, तर वाशिम, मालेगाव आणि कारंजा येथे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेडने १ लाख क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी केली आहे. अद्यापही शेतकर्‍यांकडे लाखो क्विंटल तूर पडून आहे; परंतु व्यापार्‍यांसह नाफेडची खरेदीही बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.नाफेडकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून बारदाना मागविण्यात येईल. तो सोमवारी मिळण्याचा विश्‍वास असल्याने आमची खरेदी सोमवारपासूनच करण्यात येईल. - मनोज बाजपेयी जिल्हा मार्केटिंग अधिकारी