शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न बिकट

By admin | Updated: July 7, 2014 23:39 IST

शेतकर्‍यांजवळ असलेला चारा संपल्यामुळे जनावरांचे हाल होत आहे.

मानोरा: जून महिना संपला परंतु अद्यापही तालुक्यात पावसाला सुरूवात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांजवळ असलेला चारा संपल्यामुळे जनावरांचे हाल होत आहे. आता चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मानोरा तालुक्यात डोंगराळ विभाग असल्याने रूई गोस्ता, रतनवाडी, पाळोदी, अमदरी या इतर भागात काही प्रमाणात रब्बी मोसमात पडलेल्या पावसामुळे तेथे चार्‍याची काळजी मिटली होती. मानोरा तालुक्यात पशूधन फार मोठय़ा प्रमाणावर आहे. जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांजवळ गाई, म्हशी, शेळ्या, बैल मोठय़ा प्रमाणवर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांजवळील चारा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच संपत असतो.त्यानंतर दोन महिने पुरेल एवढा चारा शेतकरी साठवून ठेवतात.त्यामुळय़ एप्रिलच्या शेवटपर्यंत हा चारा पुरतो. परंतु यावर्षी मार्च-एप्रिल मधील काळात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अवकाळी पावासमुळे शेतात उभी असलेली पर्‍हाटी हिरवी झाली. सर्वत्र हिरवे गवत उगवून जनावरांना नवा चारा उपलब्ध झाला होता.त्यानंतर मे -जून पर्यंत शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेला चारा जनावरांना खाऊ घातला. आता मात्र चारा संपला आहे. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच थोडासा पाऊस झाल्यानंतर काही शेतकर्‍यांनी पेरणी केलल्या बियाण्यातून उगवलेले अंकुर कोमेजले आहे.अद्यापही उन्हाळासदृष्य स्थिती असल्यामुळे जंगलात चारा नाही.गेल्या १0-१२ दिवसापासून जनावरे अर्धपोटी राहत आहे. यामुळे पशूधनाची अवस्था गंभीर झाली आहे. म्हणून शासनाने त्वरित चारा डेपोच्या माध्यमाने चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पशूपालकाकडून होत आहे. या अतिशय गंभीर व जिव्हाळ्याच्या मागणीकडे शासकीय अधिकारी तसेच खासदार-लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तालुक्यात चारा डेपो उघडून शेतकर्‍यांना गुरांसाठी े चारा उपलब्ध करून द्यावा अन्यथा तालुक्यातील गोधन संपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.