शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याची तयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST

कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग ...

कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे मात्र महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून होते. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास २० महाविद्यालये असून, २२ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे. पूर्वतयारी म्हणून वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, महाविद्यालय परिसराची स्वच्छता आदी कामे केली जात असल्याचे दिसून येते.

०००

प्राध्यापकांची कोरोना चाचणी

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

००

महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. संपूर्ण वर्ग निर्जंतुकीकरण केले तसेच महाविद्यालय परिसरातील साफसफाई करण्यात आली.

- विजयकुमार तुरुकमाने,

प्राचार्य बगडिया महाविद्यालय, रिसोड

०००

महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

- किशोर वाहाणे,

उपप्राचार्य रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम