शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

थकित देयकापोटी शिरपूरच्या नळ योजनेचा वीजपुरवठा खंडित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

शिरपूर येथील नागरिकांना आडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेच्या मोटर पंपाचे ३९ लाख १८ हजार तसेच ...

शिरपूर येथील नागरिकांना आडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेच्या मोटर पंपाचे ३९ लाख १८ हजार तसेच जलशुद्धीकरण केंद्राचे १० लाख ०२ हजार असे ४९ लाख २० हजार रुपये वीजदेयक ग्रामपंचायतकडे थकीत आहे. हे देयक राज्य सरकार भरणार असल्याचे विचाराधीन आहे,. मात्र एप्रिल ते सप्टेंबर या काळातील ७ लाख ८० हजार हे वीज देयक भरणे अनिवार्य आहे. हे देयक अदा न केल्यामुळे महावितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी काही प्रमाणात तरी देयक भरणे गरजेचे झाले आहे. त्यातच येथील नागरिकांकडे ७० लाख रुपये पाणीपट्टी तसेच १ कोटी ९० लाख रुपये घरपट्टी कर थकीत झाल्याने ग्रामपंचायतसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लोकांना विविध स्वरूपातील ग्रामपंचायतच्या थकित कर भरण्याचे आवाहन विविध व्हॉट्सॲप ग्रुपचा माध्यमातून करण्यात आले करण्यात आले आहे.

०००००००००

कोट: ३१ मार्चपर्यंत शिरपूर ग्रामपंचायतकडे पाणीपुरवठा योजनेच ३९ लाख १८ हजार रुपयांचे देयक थकीत आहे. तसेच शिरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे १० लाख २ हजार रुपये थकीत आहे. ३१ मार्चपर्यंतची थकबाकी शासनाकडून भरण्याचे विचाराधीन आहे. मात्र एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा व शुद्धीकरण केंद्राचे ७ लाख ८० हजार रुपये थकल्याने वीजपुरवठा कापण्यात आला आहे.

- अनिल जीवनाणी

उपविभागीय अभियंता, महावितरण, मालेगाव

००००००००००