शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

केवळ चार गावात वीजरोधक यंत्रे

By admin | Updated: June 7, 2014 01:16 IST

वाशिम जिल्ह्यात १0 वर्षात वीज पडून ७१ जणांचा मृत्यू ; सर्व गावात यंत्रे बसविण्याची गरज

सनत आहाळे / वाशिमपाऊस येण्याच्या वेळी आकाशात ढगांचा कडकडाट होऊन वीज पडण्याच्या अनेक घटना दरवर्षीच्या पावसाळयात घडतात. यापैकी काही घटनांमध्ये काही व्यक्ती जखमी होण्याच्या, तर प्रसंगी काही जणांचा मृत्यू होण्याच्याही घटना घडत असतात. वाशिम जिल्हय़ात मागील १0 वर्षात वीज पडून ७१ जण मृत्युमुखी पडले आहेत. वीज पडण्याला प्रतिबंध घालण्याचे काम वीजरोधक यंत्रे करतात; परंतु वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत केवळ चार गावांमध्येच वीजरोधक यंत्रे बसविली आहेत त्यामुळे जिल्हय़ात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्याच्या घटना केवळ पावसाळय़ाच्या चार महिन्यातच होतात असे नव्हे, तर वर्षभरातील कोणत्याही महिन्यात होतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. फक्त पावसाळय़ाच्या प्रारंभी व शेवटच्या महिन्यात त्याचे प्रमाण अधिक असते. विशेषत: जून महिन्यात हे प्रमाण जास्त असते. सन २00४ पासून सन २0१३ पर्यंत मागील १0 वर्षात वीज पडण्याच्या घटनांमध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये सर्वाधिक १९ व्यक्तीचा मृत्यू जून महिन्यात वीज पडून झाला. सप्टेंबर महिन्यात १८ व्यक्तींचा, तर ऑक्टोबर महिन्यात ११ व्यक्तींचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ६, एप्रिल महिन्यात ५, ऑगस्ट महिन्यात ४, मार्च महिना व मे महिन्यात प्रत्येकी ३ तर जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील १0 वर्षात डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यात वीज पडून मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नाही; परंतु याचा अर्थ या महिन्यात वीज पडण्याच्या घटना घडत नाहीत, असा नव्हे. वीज पडण्यास अटकाव करण्यासाठी वीजरोधक यंत्रे गावात बसविल्यास गावात वीज पडण्याचे टळू शकते. या दृष्टिकोनातून जिल्हय़ात प्रत्येक गावात वीजरोधक यंत्रे बसविल्यास वीज पडून होणारी मनुष्यहानी व पशुहानी बर्‍यापैकी टळू शकते. वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत वाशिम शहरात नगर पालिकेच्या आवारात वाशिम तालुक्यातील वारा जहागीर, मालेगाव तालुक्यात डव्हा येथे नाथनंगे महाराज संस्थानात व कारंजा तालुक्यात भुलोडा येथे अशा चार गावातच वीजरोधक यंत्रे बसविण्यात आलेली आहेत.