शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गरिबांचा बर्गर, पिझ्झा असलेल्या समोसा, कचोरीची प्लेट २५ रुपयांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:39 IST

वाशिम : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा परिणाम स्वयंपाक गृहाच्या बजेटवर झाला असतानाच नाश्त्याच्या दरातही एका ...

वाशिम : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा परिणाम स्वयंपाक गृहाच्या बजेटवर झाला असतानाच नाश्त्याच्या दरातही एका प्लेटमागे दीडपट ते दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली असून, समोसा, कचोरीच्या प्लेटचे दर १५ रुपयांहून थेट २५ ते ३० रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. त्याचा परिणाम उपाहारगृहे आणि हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. सोयाबीन तेलाचे दर सद्यस्थितीत १५५ ते १६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. रिफाईंड तेल, शेंगदाणा तेल, करडई तेल, तिळाचे तेल व जवसाच्या तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. शिवाय मैदा, बेसन, डाळी, साखर, रवा आदी कच्च्या मालाचे दरही गगनाला भिडल्याने उपाहारगृह चालकांचा व्यवसाय कठीण झाला आहे. नाश्त्याचा प्रत्येकच पदार्थ आता महागल्याने ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली आहे.

-------

म्हणून महागला समोसा, कचोरी

गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलांसह नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या दरात समोसा, कचोरी, भजी आदी पदार्थ विकणे उपाहारगृह चालकांना परवडणारे राहिले नसल्यानेच या पदार्थांचे दर वाढले आहेत.

---------------

भजी, समोशाशिवाय दिवस जाणे कठीण

१) कोट : सकाळी कामाला घरून निघाल्यानंतर रस्त्यावरच्या उपाहारागृहात समोसा, भजी घेऊन नाश्ता करायची सवयच पडली आहे. आता हे पदार्थ महागल्याने खिशावर ताण येत आहे. त्यामुळे आता घरी पोहे किंवा इतर पदार्थ खाऊन घराबाहेर पडतो; परंतु समोसा, भजीशिवाय दिवस कठीण जात आहे.

- सलीम कालीवाले,

सर्वसामान्य ग्राहक,

२) कोट : गेल्या चार महिन्यांपासून भजी, समोसा, कचोरीचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. आम्हा कामगारांना पूर्वी हे पदार्थ खाऊन दुपारपर्यंत काम करणे अवघड नव्हते; परंतु आता या नाश्त्याचा खर्च परवडणारा राहिला नाही. उपाहारगृहाच्या नाश्त्याची सवय झाल्याने थोडे अवघड झाले आहे.

-विजय आसरे,

सर्वसामान्य ग्राहक

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कोरोनाचा मोठा फटका

१) कोट : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढले असतानाच दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली असून, अपेक्षित संख्येने ग्राहक आता उपाहारगृहात येत नाहीत.

-राम महाराज जोशी,

उपाहारगृह चालक

-------------

२) कोट : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे आमच्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्राहकांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यात तेलाचे आणि पदार्थ बनविण्याच्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे व्यवसाय करणेच कठीण झाले आहे.

-गट्टूशेठ सुखाडिया,

उपाहारगृह चालक