शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

४१ ग्रामपंचायतींमध्ये दोन-चार जागांसाठीच होणार मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होत आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील ११ ...

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होत आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य अविरोध झाले, तर ४१ ग्रामपंचायतींमधील जवळपास १८० जणांनी माघार घेतल्याने या ग्रामपंचायतींमध्ये दोन, चार जागांसाठी मतदान होत आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती व सदस्य अविरोध व्हावे यासाठी यंदा लोकप्रतिनिधींसह स्थानिक पुढाऱ्यांनीदेखील प्रयत्न केले. यामध्ये काहींना यश आले तर काही ठिकाणी यश येऊ शकले नाही. ११ अविरोध ग्रामपंचायतींसह ५२ ग्रामपंचायतींमधील २५२ सदस्य अविरोध झाले आहेत. ४१ ग्रामपंचायतींमधील दोन, चार जागेसाठी लढती प्रतिष्ठेच्या झाल्याने येथे राजकारण ढवळून निघत असल्याचे दिसून येते.

०००

वाशिम तालुक्यात सर्वाधिक सदस्य अविरोध

वाशिम तालुक्यातील पाच अविरोध ग्रामपंचायतींसह १४ ग्रामपंचायतींमधील एकूण ६६ सदस्य अविरोध झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतमधील २२ सदस्य अविरोध झाले. मालेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायतींमधील ३७ सदस्य अविरोध झाले, तर दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या. मंगरूळपीर तालुक्यात ३५ सदस्य, मानोरा तालुक्यात ३३ सदस्य, कारंजा तालुक्यात २८ सदस्य अविरोध झाले.