शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

‘पीरिपा’ ही डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

वाशिम : पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर ...

वाशिम : पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर वैचारिक चळवळीतून बाबासाहेबही जिवंत राहतील. या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. स्थानिक विश्रामगृहात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघान, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, महामंत्री सरकार इंगोले, विलास राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कवाडे यावेळी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या कार्याची जनजागृती करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

.........................

...तर सरकारची साथ सोडू- जयदीप कवाडे

विद्यमान सरकार हे दलित व दीनदुबळ्यांवर अन्याय करीत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर, आम्ही विरोधकांशी देखील हातमिळवणी करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. ज्याप्रमाणे भीमा कोरेगाव लढाईत न्याय व हक्कासाठी इंग्रजांना साथ देऊन अन्याय, अत्याचार दूर करून घेतले, त्याचप्रमाणे सरकारची साथ सोडून देण्याची तयारी करू, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी यावेळी जाहीर केले.