शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

‘पीरिपा’ ही डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

वाशिम : पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर ...

वाशिम : पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर वैचारिक चळवळीतून बाबासाहेबही जिवंत राहतील. या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. स्थानिक विश्रामगृहात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघान, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, महामंत्री सरकार इंगोले, विलास राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कवाडे यावेळी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या कार्याची जनजागृती करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

.........................

...तर सरकारची साथ सोडू- जयदीप कवाडे

विद्यमान सरकार हे दलित व दीनदुबळ्यांवर अन्याय करीत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर, आम्ही विरोधकांशी देखील हातमिळवणी करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. ज्याप्रमाणे भीमा कोरेगाव लढाईत न्याय व हक्कासाठी इंग्रजांना साथ देऊन अन्याय, अत्याचार दूर करून घेतले, त्याचप्रमाणे सरकारची साथ सोडून देण्याची तयारी करू, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी यावेळी जाहीर केले.