शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पांगरी (महादेव) गाव भोगतेय ‘मरण यातना’!

By admin | Updated: September 28, 2016 01:32 IST

अकोला, वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार; त-हाळा ग्रामपंचायतीने नाकारले पालकत्व.

साहेबराव राठोडमंगरूळपीर(जि. वाशिम), दि. २७- देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली; मात्र आजही दुर्गम भागातील खेड्यांचा पूर्णत: विकास झालेला नाही. अशाच गावांमधील एक असलेले पांगरी (महादेव) हे गाव तर मरण यातना भोगत आहे. ८00 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाला अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, नजिकच्या तर्‍हाळा ग्रामपंचायतीनेही गावाचे पालकत्व नाकारले आहे. परिणामी, या गावातील रहिवाश्यांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. सन २00३ साली अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात समावेश झालेल्या पांगरी (महादेव) या गावाची अवस्था आजमितीस अत्यंत दयनिय झाली आहे. जेव्हापासून या गावाचा समावेश वाशिम जिल्ह्यात झाला, तेव्हापासूनच स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा तर मिळाला नाहीच; परंतु नजीकच्या कुठल्याच ग्रामपंचायतने या गावाला आपलेसे केले नाही. परिणामी, संपूर्ण गावकर्‍यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. म्हणायला, जिल्हा परिषद शाळा, विद्युत वितरण व्यवस्था, अंगणवाडी आदींचा कारभार अकोला जिल्ह्यातून सुरू आहे; मात्र शासनस्तरावरून पुरविल्या जाणार्‍या वैयक्तिक योजनांचा लाभ एकाही गावकर्‍याला मिळत नसल्याचे वास्तव आहे. पांगरी ग्रामवासीयांचे हे दुखणे निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा जिल्हा प्रशासन कुठल्याच प्रकारचे ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी या गावाचा कारभार नजीकच्या तर्‍हाळा ग्रामपंचायतीमधून पाहिला जायचा; मात्र त्या ग्रामपंचायतीनेही यापुढे पांगरीच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळण्यास नकार दर्शविणारा ठराव घेतल्याची माहिती आहे. तथापि, चोहोबाजूंनी निराधार झालेल्या पांगरी ग्रामवासीयांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. घरकुल लाभासाठी कागदपत्रच मिळेना!संपूर्ण वाशिम जिल्ह्यात सध्या ह्यसर्वांसाठी घरेह्ण, या उपक्रमांतर्गत घरकुलांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी घरकुल उभारण्यासाठी स्वत:कडे पुरेशी जागा असल्याबाबत ग्रामसचिवाचा दाखला, नमुना आठ ह्यअह्ण आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍याचा दाखला, आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे; मात्र पांगरी (महादेव) या गावाला कुठल्याच गटग्रामपंचायत अथवा ग्रामपंचायतीचा आधार नसल्यामुळे हे कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत गावकर्‍यांनी व्यक्त केली.