शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता जनजागृतीसाठी कामरगावातील दोघांची पंढरपूर-आळंदी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST

कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली ...

कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली जाते. शासनाच्या या उपक्रमांना हातभार लावण्यासह समाजातील ज्वलंत समस्यांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने हे दोघे मागील ४ वर्षांपासून दुचाकीने १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास करीत आहेत.

स्वच्छता अभियानासह शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने यांची सतत धडपड सुरू आहे. यासाठी ते कामरगाव ते पंढरपूर, हा १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास दुचाकीने करतात. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष असून, २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कामरगाव येथून त्यांनी पंढरपूर आळंदीकडे प्रस्थान केले. ३० जानेवारी रोजी ते पंढरपूर येथे पोहोचणार आहेत, त्यानंतर आळंदी करून ३ फेब्रुवारी रोजी ते कामरगाव येथे परत येतील. कामरगाव ते आळंदी हा १४०० किलोमीटर अंतराचा येण्या-जाण्याचा प्रवास ते सहा दिवसांत पूर्ण करणार आहेत. मार्गात स्वच्छ भारत अभियान, शौचालयाचा नियमित वापर, बेटी बचाओ बेट पढाओ, झाडे लावा झाडे जगवा व पाणी अडवा पाणी जिरवा, अशा घोषणा देत मार्गात ठिकठिकाणी उपस्थितांना ते उपरोक्त समस्यांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहेत. आपल्या जनजागृतीने समाज मनावर काही फरक पडेल की नाही, हे माहीत नाही, परंतु आपण जे करतो ते चांगल्यासाठी करतो असा विश्वास असल्याने गेल्या चार वर्षांपासून हे दोघेजण जनजागृतीचे कार्य करीत आहे. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेसाठी शासनानेही त्यांची दखल घेण्याची गरज आहे.