शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता जनजागृतीसाठी कामरगावातील दोघांची पंढरपूर-आळंदी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST

कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली ...

कामरगाव : शासनाच्या वतीने ज्वलंत समस्यांबाबत जाहिराती, पथनाट्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून यातून विविध विषयांची जनजागृती केली जाते. शासनाच्या या उपक्रमांना हातभार लावण्यासह समाजातील ज्वलंत समस्यांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने हे दोघे मागील ४ वर्षांपासून दुचाकीने १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास करीत आहेत.

स्वच्छता अभियानासह शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी कामरगाव येथील सुभाष डोईफोडे व सुरेश धुमाेने यांची सतत धडपड सुरू आहे. यासाठी ते कामरगाव ते पंढरपूर, हा १४०० किलोमीटर अंतराचा प्रवास दुचाकीने करतात. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष असून, २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कामरगाव येथून त्यांनी पंढरपूर आळंदीकडे प्रस्थान केले. ३० जानेवारी रोजी ते पंढरपूर येथे पोहोचणार आहेत, त्यानंतर आळंदी करून ३ फेब्रुवारी रोजी ते कामरगाव येथे परत येतील. कामरगाव ते आळंदी हा १४०० किलोमीटर अंतराचा येण्या-जाण्याचा प्रवास ते सहा दिवसांत पूर्ण करणार आहेत. मार्गात स्वच्छ भारत अभियान, शौचालयाचा नियमित वापर, बेटी बचाओ बेट पढाओ, झाडे लावा झाडे जगवा व पाणी अडवा पाणी जिरवा, अशा घोषणा देत मार्गात ठिकठिकाणी उपस्थितांना ते उपरोक्त समस्यांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहेत. आपल्या जनजागृतीने समाज मनावर काही फरक पडेल की नाही, हे माहीत नाही, परंतु आपण जे करतो ते चांगल्यासाठी करतो असा विश्वास असल्याने गेल्या चार वर्षांपासून हे दोघेजण जनजागृतीचे कार्य करीत आहे. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेसाठी शासनानेही त्यांची दखल घेण्याची गरज आहे.