शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय पद्धतीच्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण नगण्य!

By admin | Updated: May 11, 2017 06:59 IST

१८ शेतकरी गट पूर्णत: सक्रिय करण्यात ‘आत्मा’ला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अद्याप यश मिळालेले नाही.

सुनील काकडे वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गत वर्षभरात जिल्ह्यात ३६४ हेक्टरवर स्थापन झालेले १८ शेतकरी गट पूर्णत: सक्रिय करण्यात "आत्मा"ला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अद्याप यश मिळालेले नाही. परिणामी, जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण आजही नगण्य असल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, ह्यआत्माह्ण अंतर्गत २०१६-१७ च्या खरीप हंगामापासून प्रत्येक जिल्ह्यात गटनिहाय शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य, फळे, भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण त्यांना देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात ह्यआत्माह्णअंतर्गत वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० शेतकऱ्यांचे तीन याप्रमाणे १८ गट स्थापन झाले आहेत. या माध्यमातून ९०० एकर अर्थात ३६४ हेक्टरवर सेंद्रिय शेती फुलायला हवी होती. मात्र, बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांचा अपवाद वगळल्यास विविध स्वरूपातील अडचणींमुळे सेंद्रिय शेतीला जिल्ह्यात अद्याप चालना मिळालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्यस्थितीत या अभियानात सहभागी एकाही शेतकऱ्याच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने कुठल्याच प्रकारचे उत्पादन काढणे सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राष्ट्रीय शेती शाश्वत अभियानाचा मूळ उद्देश बहुतांशी असफल ठरल्याचे सिद्ध होत आहे.        शेतीतून अधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासापायी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे मात्र शेतीच आरोग्य धोक्यात सापडले असून, ते टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात अद्याप माती परीक्षणासाठी शासकीय प्रयोगशाळा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही माती परीक्षणासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अथवा करडा (ता. रिसोड) येथील कृषी विज्ञान केंद्रावरच विसंबून राहावे लागत आहे. जिल्ह्याला मृद सर्वेक्षण, मृद चाचणी प्रयोगशाळा मंजूर झाली. यासाठी लागणारा निधी आणि साहित्यदेखील मिळाले असताना प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही.       शाश्वत शेती अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याची प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक ह्यआत्माह्णच्या माध्यमातून व्हायला हवे. याशिवाय माती परीक्षण, पाणी परीक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व याअंतर्गत शेतकऱ्यांना पटवून द्यायला हवे; परंतु असे कुठलेच उपक्रम "आत्मा" अंतर्गत सुरू नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.- रवी मारशेटवारशेतकरी, वाशिम