शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरच्या अडोळ प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा!

By admin | Updated: September 20, 2016 01:10 IST

रब्बी हंगामावर संकट; रिसोड व शिरपूरसाठी पाणी ठेवले जाणार राखून.

शिरपूर जैन (जि. वाशिम), दि. १९- यंदा दमदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील बहुतांश धरणांनी १00 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे सिंचनाकरिता पाणी राखून ठेवत रिसोड आणि शिरपूर जैनला ज्या अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो, त्यात आजमितीस केवळ ४0 टक्के पाणीसाठा झाला आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन धरण न भरल्यास भविष्यात सिंचनाच्या प्रश्नासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरपूरपासून १0 किलोमीटर अंतरावर अडोळ प्रकल्प वसलेला आहे. या प्रकल्पातून वाघी, बोराळा, खंडाळा, पार्डी, रिठद, येवती, ढोरखेडा यासह इतर गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. सोबतच रिसोड आणि शिरपूर या दोन गावांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. यावर्षी जिल्हय़ात सर्वदूर मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळला; मात्र शिरपूर, करंजी, शेलगाव, शिरसाळा, खंडाळा या अडोळ परिसरातील गावामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. शिरपूर येथे केवळ ४७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, प्रकल्पामधील पाणीसाठय़ात योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे आज रोजी प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठय़ाची नोंद आहे. इतक्या कमी प्रमाणात प्रकल्पात जलसाठा असून येत्या काही दिवसात परतीचा पाऊस न झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम निश्‍चितपणे धोक्यात येऊ शकतो. तसेच प्रकल्पातून रिसोड व शिरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असतो, त्यावरही बहुतांशी परिणाम होण्याचे संकेत आहेत.