शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

शिरपूरच्या अडोळ प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा!

By admin | Updated: September 20, 2016 01:10 IST

रब्बी हंगामावर संकट; रिसोड व शिरपूरसाठी पाणी ठेवले जाणार राखून.

शिरपूर जैन (जि. वाशिम), दि. १९- यंदा दमदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील बहुतांश धरणांनी १00 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे सिंचनाकरिता पाणी राखून ठेवत रिसोड आणि शिरपूर जैनला ज्या अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो, त्यात आजमितीस केवळ ४0 टक्के पाणीसाठा झाला आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन धरण न भरल्यास भविष्यात सिंचनाच्या प्रश्नासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरपूरपासून १0 किलोमीटर अंतरावर अडोळ प्रकल्प वसलेला आहे. या प्रकल्पातून वाघी, बोराळा, खंडाळा, पार्डी, रिठद, येवती, ढोरखेडा यासह इतर गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. सोबतच रिसोड आणि शिरपूर या दोन गावांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. यावर्षी जिल्हय़ात सर्वदूर मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळला; मात्र शिरपूर, करंजी, शेलगाव, शिरसाळा, खंडाळा या अडोळ परिसरातील गावामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. शिरपूर येथे केवळ ४७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, प्रकल्पामधील पाणीसाठय़ात योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे आज रोजी प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठय़ाची नोंद आहे. इतक्या कमी प्रमाणात प्रकल्पात जलसाठा असून येत्या काही दिवसात परतीचा पाऊस न झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम निश्‍चितपणे धोक्यात येऊ शकतो. तसेच प्रकल्पातून रिसोड व शिरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असतो, त्यावरही बहुतांशी परिणाम होण्याचे संकेत आहेत.