शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची

By admin | Updated: August 3, 2015 00:56 IST

पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवणे गरजेचे; जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत.

वाशिम : गत पाच-सात वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जलपातळी घटत चालली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट निर्माण होते. संभाव्य जलसंकट आटोक्यात आणण्यासाठी सुरूवातीपासूनच 'पाणी बचत' करणे गरजेचे बनत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 'लोकमत'तर्फे २ ऑगस्ट रोजी ठराविक प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, पाणी बचत करणे काळाची गरज असल्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. बेसुमार वृक्षतोड व अन्य कारणांमुळे दरवर्षीच पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळ्यात पावसाळा असे चित्र असते. पावसात सातत्य नसल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'तर्फे काही प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, जलपुनर्भरण, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, पाणी बचत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग' या पाणी बचतीच्या व्यवस्थेची माहिती आपणाला आहे काय? या प्रश्नावर ७८ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर २२ टक्के नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत प्रशासनाने आणखी जनजागृती करावी, असे ६७ टक्के नागरिकांना वाटते. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबविणे आवश्यक ठरत असल्याचे मत ८२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर 'पाणी बचत' करणे गरजेचे आहे, असे १00 टक्के नागरिकांचे मत आहे. जलपातळी वाढविण्याकामी जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत ठरणारी आहे, असे ९४ टक्के नागरिकांना वाटते. निसर्ग चक्र अनियमिततेला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे, असे मत ७४ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे.