शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची

By admin | Updated: August 3, 2015 00:56 IST

पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवणे गरजेचे; जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत.

वाशिम : गत पाच-सात वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जलपातळी घटत चालली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट निर्माण होते. संभाव्य जलसंकट आटोक्यात आणण्यासाठी सुरूवातीपासूनच 'पाणी बचत' करणे गरजेचे बनत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 'लोकमत'तर्फे २ ऑगस्ट रोजी ठराविक प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, पाणी बचत करणे काळाची गरज असल्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. बेसुमार वृक्षतोड व अन्य कारणांमुळे दरवर्षीच पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळ्यात पावसाळा असे चित्र असते. पावसात सातत्य नसल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'तर्फे काही प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, जलपुनर्भरण, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, पाणी बचत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग' या पाणी बचतीच्या व्यवस्थेची माहिती आपणाला आहे काय? या प्रश्नावर ७८ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर २२ टक्के नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत प्रशासनाने आणखी जनजागृती करावी, असे ६७ टक्के नागरिकांना वाटते. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबविणे आवश्यक ठरत असल्याचे मत ८२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर 'पाणी बचत' करणे गरजेचे आहे, असे १00 टक्के नागरिकांचे मत आहे. जलपातळी वाढविण्याकामी जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत ठरणारी आहे, असे ९४ टक्के नागरिकांना वाटते. निसर्ग चक्र अनियमिततेला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे, असे मत ७४ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे.