शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची

By admin | Updated: August 3, 2015 00:56 IST

पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवणे गरजेचे; जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत.

वाशिम : गत पाच-सात वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जलपातळी घटत चालली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट निर्माण होते. संभाव्य जलसंकट आटोक्यात आणण्यासाठी सुरूवातीपासूनच 'पाणी बचत' करणे गरजेचे बनत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 'लोकमत'तर्फे २ ऑगस्ट रोजी ठराविक प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, पाणी बचत करणे काळाची गरज असल्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. बेसुमार वृक्षतोड व अन्य कारणांमुळे दरवर्षीच पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळ्यात पावसाळा असे चित्र असते. पावसात सातत्य नसल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'तर्फे काही प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, जलपुनर्भरण, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, पाणी बचत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग' या पाणी बचतीच्या व्यवस्थेची माहिती आपणाला आहे काय? या प्रश्नावर ७८ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर २२ टक्के नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत प्रशासनाने आणखी जनजागृती करावी, असे ६७ टक्के नागरिकांना वाटते. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबविणे आवश्यक ठरत असल्याचे मत ८२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर 'पाणी बचत' करणे गरजेचे आहे, असे १00 टक्के नागरिकांचे मत आहे. जलपातळी वाढविण्याकामी जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत ठरणारी आहे, असे ९४ टक्के नागरिकांना वाटते. निसर्ग चक्र अनियमिततेला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे, असे मत ७४ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे.