शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची

By admin | Updated: August 3, 2015 00:56 IST

पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवणे गरजेचे; जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत.

वाशिम : गत पाच-सात वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जलपातळी घटत चालली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट निर्माण होते. संभाव्य जलसंकट आटोक्यात आणण्यासाठी सुरूवातीपासूनच 'पाणी बचत' करणे गरजेचे बनत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 'लोकमत'तर्फे २ ऑगस्ट रोजी ठराविक प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, पाणी बचत करणे काळाची गरज असल्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. बेसुमार वृक्षतोड व अन्य कारणांमुळे दरवर्षीच पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळ्यात पावसाळा असे चित्र असते. पावसात सातत्य नसल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'तर्फे काही प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, जलपुनर्भरण, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, पाणी बचत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग' या पाणी बचतीच्या व्यवस्थेची माहिती आपणाला आहे काय? या प्रश्नावर ७८ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर २२ टक्के नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत प्रशासनाने आणखी जनजागृती करावी, असे ६७ टक्के नागरिकांना वाटते. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबविणे आवश्यक ठरत असल्याचे मत ८२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर 'पाणी बचत' करणे गरजेचे आहे, असे १00 टक्के नागरिकांचे मत आहे. जलपातळी वाढविण्याकामी जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत ठरणारी आहे, असे ९४ टक्के नागरिकांना वाटते. निसर्ग चक्र अनियमिततेला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे, असे मत ७४ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे.