शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:25 IST

सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देकर्जमाफी, महागाई विरोधात हल्लाबोल आंदोलन : हजारो शेतकºयांची पदयात्रा नागपूरकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. राकाँच्या सदैव गरजणाऱ्या ‘तोफा’ यवतमाळात एकवटल्या होत्या. यवतमाळातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध घटकांच्या समस्यांची बारूद घेऊन या तोफा नागपूरकडे रवाना झाल्या.माजी कृषीमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच यवतमाळात येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविला होता. हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यासाठी शेतकºयांची दिंडी काढणार असल्याची घोषणाही तेव्हाच पवार यांनी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी येथील समता मैदानातून हजारो शेतकºयांची पदयात्रा घोषणा देत निघाली. समता मैदानासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांची लक्षणीय संख्या दिसली. पक्षाच्या टोप्या घालून हाती मागण्यांचे फलक घेतलेले शेतकरी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत होते.पदयात्रा निघण्यापूर्वी समता मैदानावर राज्याच्या, विदर्भाच्या आणि विशेषत: यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागर करण्यात आला. ताजे आणि गंभीर असलेले शेतकरी विषबाधा, कपाशीवरील बोंडअळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविण्यात आला. फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्यावर मुख्यमंत्र्यांना यवतमाळात लपत-छपत का यावे लागले, असा बोचरा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर ‘मी लाभार्थी’ अशा जाहिराती देऊन मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.जिल्ह्यातील विषबाधा, आत्महत्याग्रस्त शेतकºयांना श्रद्धांजलीराज्याच्या शेतीला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून जाणीवपूर्वक आंदोलन सुरू करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. हल्लाबोल पदयात्रेला सुरूवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच फवारणीदरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण समता मैदानातील हजारो शेतकरी, कार्यकर्ते अत्यंत शांततेत उभे राहिले.नेत्यांच्या नारेबाजीला उत्स्फूर्त प्रतिसादयवतमाळातून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जाहीर सभेत नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनातील नारे शेतकऱ्यांकडून वदवून घेतले. बोल रे बोल हल्ला बोल, महंगाईपर हल्लाबोल, बेरोजगारीपर हल्लाबोल, सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असे नारे यावेळी दणाणत होते. सभा संपून पदयात्रेला प्रारंभ होताना मात्र आमदार प्रकाश गजभिये यांनी अत्यंत तिखट घोषणा दिली. सरकार नाही भानावर लावा त्यांच्या कानावर, या घोषणेनेला मात्र प्रचंड प्रतिसाद मिळत होता.