शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; बोगस डाॅक्टरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक ...

वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक जण एमबीबीएस, बीएएमएस असल्याचे भासवितात. ग्रामीण भागात त्याची फारशी शहानिशा कोणी करत नसल्याने हा प्रकार अलीकडच्या काळात अधिकच फोफावला आहे. अशा बोगस डाॅक्टरांमुळे मात्र वेळप्रसंगी रुग्णांचा जीवही धोक्यात सापडतो. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने धडक कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

...................

२५

जिल्ह्यात एकूण बोगस डाॅक्टर्सवर कारवाई

०५

विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई

.................

तालुकानिहाय बोगस डाॅक्टर्स

वाशिम - ७

रिसोड - ६

मालेगाव - ३

कारंजा लाड - ६

मानोरा - ३

.............................

तक्रार आली तरच कारवाई

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकांश गावांमध्ये बोगस डाॅक्टर्सकडून रुग्णांवर उपचार केले जातात. असे असताना संबंधिताची तक्रार आल्याशिवाय आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनीही सतर्क राहून अशा बोगस डाॅक्टरांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

......................

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

१) कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील अनेकांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशा प्रकारची लक्षणे दिसून आली. असे असतानाही बहुतांश लोकांनी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी न करताच घरगुती उपचार करण्यावर भर दिला. गावात स्वत:ला डाॅक्टर म्हणविणाऱ्यांकडून मिळणाऱ्या गोळ्या खाऊन अनेकांनी कोरोनाच्या संसर्गाला हलक्यात घेतले.

२) आरटीपीसीआर चाचणी केल्यास आणि त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास शहरातील कोविड केअर हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागणार. त्यात वेळ आणि पैसेही खर्च होणार, या भीतीने ग्रामीण भागातील अनेकांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यास प्राधान्य दिले. कोरोनाचा संसर्ग अधिक बळावल्यानंतर मात्र याच मंडळींनी शहरांकडे धाव घेतली. मात्र, तोवर बराच उशीर झाल्याने अनेकांना जीवदेखील गमवावा लागला.

३) शहरांमधील नावाजलेल्या एमबीबीएस डाॅक्टरांच्या दवाखान्यांमध्ये कंपाउंडर म्हणून काम करणारे बहुतांश लोक हे गावखेड्यात वास्तव्याला आहेत. गावात त्यांना डाॅक्टर म्हणूनच ओळखले जाते. कुठलाही आजार झाल्यास अनेक जण त्यांच्याकडून मिळणाऱ्या उपचारावर विश्वास ठेवतात. नेमका हाच प्रकार कोरोनाच्या काळातही घडला.