शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; बोगस डाॅक्टरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक ...

वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक जण एमबीबीएस, बीएएमएस असल्याचे भासवितात. ग्रामीण भागात त्याची फारशी शहानिशा कोणी करत नसल्याने हा प्रकार अलीकडच्या काळात अधिकच फोफावला आहे. अशा बोगस डाॅक्टरांमुळे मात्र वेळप्रसंगी रुग्णांचा जीवही धोक्यात सापडतो. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने धडक कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

...................

२५

जिल्ह्यात एकूण बोगस डाॅक्टर्सवर कारवाई

०५

विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई

.................

तालुकानिहाय बोगस डाॅक्टर्स

वाशिम - ७

रिसोड - ६

मालेगाव - ३

कारंजा लाड - ६

मानोरा - ३

.............................

तक्रार आली तरच कारवाई

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकांश गावांमध्ये बोगस डाॅक्टर्सकडून रुग्णांवर उपचार केले जातात. असे असताना संबंधिताची तक्रार आल्याशिवाय आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनीही सतर्क राहून अशा बोगस डाॅक्टरांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

......................

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

१) कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील अनेकांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशा प्रकारची लक्षणे दिसून आली. असे असतानाही बहुतांश लोकांनी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी न करताच घरगुती उपचार करण्यावर भर दिला. गावात स्वत:ला डाॅक्टर म्हणविणाऱ्यांकडून मिळणाऱ्या गोळ्या खाऊन अनेकांनी कोरोनाच्या संसर्गाला हलक्यात घेतले.

२) आरटीपीसीआर चाचणी केल्यास आणि त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास शहरातील कोविड केअर हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागणार. त्यात वेळ आणि पैसेही खर्च होणार, या भीतीने ग्रामीण भागातील अनेकांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यास प्राधान्य दिले. कोरोनाचा संसर्ग अधिक बळावल्यानंतर मात्र याच मंडळींनी शहरांकडे धाव घेतली. मात्र, तोवर बराच उशीर झाल्याने अनेकांना जीवदेखील गमवावा लागला.

३) शहरांमधील नावाजलेल्या एमबीबीएस डाॅक्टरांच्या दवाखान्यांमध्ये कंपाउंडर म्हणून काम करणारे बहुतांश लोक हे गावखेड्यात वास्तव्याला आहेत. गावात त्यांना डाॅक्टर म्हणूनच ओळखले जाते. कुठलाही आजार झाल्यास अनेक जण त्यांच्याकडून मिळणाऱ्या उपचारावर विश्वास ठेवतात. नेमका हाच प्रकार कोरोनाच्या काळातही घडला.