शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा नियोजन’च्या निधीवर राहणार संनियंत्रण समितीचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

वाशिम : शासनाकडून मिळालेला निधी विहित कालावधीतही काही विभागांना खर्च करता येत नसल्यावरून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा ...

वाशिम : शासनाकडून मिळालेला निधी विहित कालावधीतही काही विभागांना खर्च करता येत नसल्यावरून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत संनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या सभेत रविवारी घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर यापुढे संनियंत्रण समितीचा वॉच राहणार आहे.

नियोजन भवन येथे १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून वाशिमचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. हा निधी विहित कालावधीत खर्च होणे अपेक्षित असताना, अनेक विभागांचा निधी अखर्चित राहत असल्याने अखर्चित निधी हा शासनजमा करण्याची वेळ येते. यापुढे निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता म्हणून सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे आणि उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करीत विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर संनियंत्रण करणारी समिती गठित करण्यात येईल. जिल्हा समितीकडून देण्यात येणारा निधी हा वेळेत आणि निकषानुसार खर्च करण्याकडे समितीचे लक्ष राहणार आहे. प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाशिम या आकांक्षित जिल्ह्यात काम करताना विकासाचे आव्हान स्वीकारून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गवळी यांनी जिल्ह्यातील काही गावांतील वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे सुचविले. आमदार ॲड. सरनाईक यांनी रिसोड शहरातील मुख्य रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार पाटणी यांनी जिल्ह्यातील कृषी पंपांच्या वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यात यावा. ग्रामपंचायतीमध्ये बंद असलेले आर. ओ. प्रकल्प त्वरित सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार झनक म्हणाले, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे सुचविले.

-----------------------------१७० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

या सभेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१ अंतर्गत मार्च-२०२१ अखेर खर्च झालेल्या १७० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली, तर महसूल व भांडवली क्षेत्रांतर्गत २८ कोटी ३५ लाख रुपयांच्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आमरे यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना याबाबत सादरीकरण केले.

------------------------कोरोना उपाययोजनांसाठी ५५ कोटी

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून १३१ योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यावर्षी कोविड-१९ उपाययोजनांसाठी ५५ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.