शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

‘जिल्हा नियोजन’च्या निधीवर राहणार संनियंत्रण समितीचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

वाशिम : शासनाकडून मिळालेला निधी विहित कालावधीतही काही विभागांना खर्च करता येत नसल्यावरून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा ...

वाशिम : शासनाकडून मिळालेला निधी विहित कालावधीतही काही विभागांना खर्च करता येत नसल्यावरून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत संनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या सभेत रविवारी घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर यापुढे संनियंत्रण समितीचा वॉच राहणार आहे.

नियोजन भवन येथे १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून वाशिमचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. हा निधी विहित कालावधीत खर्च होणे अपेक्षित असताना, अनेक विभागांचा निधी अखर्चित राहत असल्याने अखर्चित निधी हा शासनजमा करण्याची वेळ येते. यापुढे निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता म्हणून सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे आणि उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करीत विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर संनियंत्रण करणारी समिती गठित करण्यात येईल. जिल्हा समितीकडून देण्यात येणारा निधी हा वेळेत आणि निकषानुसार खर्च करण्याकडे समितीचे लक्ष राहणार आहे. प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाशिम या आकांक्षित जिल्ह्यात काम करताना विकासाचे आव्हान स्वीकारून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गवळी यांनी जिल्ह्यातील काही गावांतील वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे सुचविले. आमदार ॲड. सरनाईक यांनी रिसोड शहरातील मुख्य रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार पाटणी यांनी जिल्ह्यातील कृषी पंपांच्या वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यात यावा. ग्रामपंचायतीमध्ये बंद असलेले आर. ओ. प्रकल्प त्वरित सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार झनक म्हणाले, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे सुचविले.

-----------------------------१७० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

या सभेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१ अंतर्गत मार्च-२०२१ अखेर खर्च झालेल्या १७० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली, तर महसूल व भांडवली क्षेत्रांतर्गत २८ कोटी ३५ लाख रुपयांच्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आमरे यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना याबाबत सादरीकरण केले.

------------------------कोरोना उपाययोजनांसाठी ५५ कोटी

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून १३१ योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यावर्षी कोविड-१९ उपाययोजनांसाठी ५५ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.