शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

पद गमावलेल्या सदस्यांचा पोटनिवडणुकीत लागणार कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) सहा पंचायत समित्यांमधील २७ व जिल्हा परिषदेतील ...

वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) सहा पंचायत समित्यांमधील २७ व जिल्हा परिषदेतील १४ सदस्यांची पदे रिक्त झाल्याचा आदेश पारित केला. यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णत: शून्यावर आले असून, प्रत्यक्ष पोटनिवडणुकीद्वारे ही पदे आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरली जाणार आहेत. पायउतार झालेले सदस्य या निवडणुकीला सामोरे जातील; पण पुन्हा बाजी मारण्यासाठी त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक ७ जानेवारी २०२० रोजी झाली होती. ८ जानेवारीला मतमोजणी होऊन २७ टक्के आरक्षणानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातून जिल्हा परिषदेत १४, तर पंचायत समित्यांमध्ये २७ सदस्य आरूढ झाले. मात्र, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याप्रकरणी दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी आदेश पारित करून आधी वाशिम जिल्हा परिषदेतील १४ आणि वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव या चार पंचायत समित्यांमधील १९ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरविले. त्यानंतर १६ मार्च २०२१ रोजी धडकलेल्या आदेशात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील जागा कमाल आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेत असोत अथवा नसोत, न्यायालयाच्या आदेशाने संबंधित सर्व जागा रिक्त झाल्याचे विधिमत प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा येथीलही प्रत्येकी चार, अशा एकूण आठ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण आता शून्यावर आले असून, पोटनिवडणुकीद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातून सदर जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालय व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पायउतार झालेल्या ओबीसी सदस्यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती आहे, तसेच पुन्हा निवडणूक झाल्यास त्यालाही सामोरे जाण्याच्या ते तयारीत आहेत. मात्र, गतवेळच्या निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव झालेल्या उमेदवारांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय पायउतार झालेल्यांपैकी ज्यांनी वर्षभरात विकासाला दुय्यम स्थान दिले, असे तत्कालीन सदस्य अडचणीत सापडणार आहेत, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.

...................

बॉक्स :

एकीकडे पुनर्विचार याचिकेची तयारी, दुसरीकडे वाजतोय ‘बिगुल!’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील १४ व पंचायत समित्यांमधील २७ ओबीसी सदस्यांची पदे रिक्त झाल्याने संबंधितांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्यासंबंधी ‘बिगुल’ वाजत आहे. विशेषत: येत्या २३ मार्च रोजी रिक्त एकूण जागांपैकी ५० टक्के जागांवर महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता निवडणुकीशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय तज्ज्ञांमधून बोलले जात आहे.