शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

बाहेरगावी जाण्याकरिता कुटुंबातील अनेकांना पाडले आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST

अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पाेलीस विभागाकडून ई पास देण्यात येत हाेता. यामध्ये शेकडाे लाेकांनी आपल्याला दवाखान्याचे काम आहे, घरी ...

अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पाेलीस विभागाकडून ई पास देण्यात येत हाेता. यामध्ये शेकडाे लाेकांनी आपल्याला दवाखान्याचे काम आहे, घरी वडील आजारी आहेत अशी कारणे सांगून ई पाससाठी अर्ज केले हाेते. परंतु पाेलीस विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणी व अर्जासाेबत आवश्यक असलेली कागदपत्रे न जाेडल्याने अशा व्यक्त्तिंचे ई पास रद्द करण्यात आले. ज्यांना खराेखरच अत्यावश्यक कामे हाेती त्यांनी त्रुटींची पूर्तता करुन पुन्हा अर्ज केलेत, त्यांना ई पास पाेलीस विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले. ई पास द्वारे जिल्ह्यासह परजिल्ह्यात अनेकांनी प्रवास केला.

....................

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारणे

वडिलांची प्रकृती ठिक नाही, त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावे लागते.

पत्नीची डिलिव्हरी असून तिला माहेरी घेऊन जायचे आहे.

आई वडिलांना काेराेना झाला आहे, त्यांना पाहण्यासाठी जायचे आहे.

नजिकच्या नातेवाईकांचे लग्नाचे कारण

कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे, वडिलांना शुगर, बीपीचा त्रास असल्याचे कारण

अनेक दिवसांपासून गावाकडे गेलाे नसल्याचे कारण

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारणे

...............

सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी

वाशिम जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाण्यासाठी करण्यात आलेल्या ई पाससाठी बहुतांश नागरिकांचे कारण मेडिकल इमर्जन्सी दाखविण्यात आले. यामध्ये कुटुंबातील व्यक्तिंना आजार दाखविणे इ. कारणे आहेत. परंतु पाेलीस विभागाकडून कागदपत्रे मागितल्यानंतर ते देण्यात आले नाहीत.

.............

परजिल्ह्यातील नागरिकांना गावाकडे जायचे आहे, काही दवाखान्याचे काम आहे यासह अत्यावश्यक कामासाठी जायचे असल्यास ई पास देण्याचे नियाेजन हाेते. शहानिशा केल्यानंतर नागरिकांना ई पास देण्यात आला.

- वसंत परदेसी, पाेलीस अधीक्षक, वाशिम