शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

मंगरुळपीरमधील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अखेर सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:06 IST

मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे वसतीगृह यंदा सुरू न झाल्याने गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत लोकमतने ‘मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्यानंतर खोली भाड्याने घेऊन शिक्षण घ्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. ही बाब लक्षात घेत शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याणमार्फत तालुकास्तरावर भव्य वसतीगृहाची निर्मिती करुन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. शासनाच्या या निर्णयानुसार मंगरुळपीर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह उभारण्यात आले, मात्र यंदाचे सत्र सुरू झाल्यानंतरही हे शासकीय वसतीगृह श् केवळ पाण्याचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत होतेच. शिवाय घरुन शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागून शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे कठीण झाले होते. ही बाब गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देऊन वसतीगृह सुरु करणे नितांत गरजेची असल्याची मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येत होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या वसतीगृृहात आवश्यक सुविधांची पूर्तता करीत ते सुरू केले. इतर सुविधांही उपलब्ध करणार गतवर्षी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाले नाही, तसेच या ठिकाणी व्यायाम शाळा आहे. मात्र साहित्य नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अशा अनेक समस्या या वसतीगृहात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.