शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरमधील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अखेर सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:06 IST

मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे वसतीगृह यंदा सुरू न झाल्याने गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत लोकमतने ‘मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्यानंतर खोली भाड्याने घेऊन शिक्षण घ्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. ही बाब लक्षात घेत शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याणमार्फत तालुकास्तरावर भव्य वसतीगृहाची निर्मिती करुन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. शासनाच्या या निर्णयानुसार मंगरुळपीर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह उभारण्यात आले, मात्र यंदाचे सत्र सुरू झाल्यानंतरही हे शासकीय वसतीगृह श् केवळ पाण्याचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत होतेच. शिवाय घरुन शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागून शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे कठीण झाले होते. ही बाब गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देऊन वसतीगृह सुरु करणे नितांत गरजेची असल्याची मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येत होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या वसतीगृृहात आवश्यक सुविधांची पूर्तता करीत ते सुरू केले. इतर सुविधांही उपलब्ध करणार गतवर्षी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाले नाही, तसेच या ठिकाणी व्यायाम शाळा आहे. मात्र साहित्य नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अशा अनेक समस्या या वसतीगृहात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.