शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तक्रार स्विकारण्यापूरते र्मयादित राहिले शेतकर्‍यांचे नुकसान

By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST

झालेल्या नुकसानीची किमान पाहणी करण्याचे औदार्य वाशिमच्या वनविभागाने दाखविले नसल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली.

वाशिम : शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील पिकाचे हरिणांच्या कळपाने केलेले नुकसान वनविभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याची तसदी वनविभागाने घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.एवढेच काय तर झालेल्या नुकसानीची माहिती देण्याला ११ दिवस लोटूनही शिवारात येवून झालेल्या नुकसानीची किमान पाहणी करण्याचे औदार्य वाशिमच्या वनविभागाने दाखविले नसल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. वाशिम भाग १ महसुल मंडळातील जवळपास २0 शेतकर्‍यांच्या पिकांवर हरिणांच्या कळपाने ३0 जूलैच्या पूर्वी डल्ला मारल्याने त्या मंडळातील काही शेतकर्‍याचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. वाशिम भाग १ महसुल मंडळातील शशिकलाबाई विश्‍वंभर ढवळे, गजानन राजगूरु, विजयसिह ठाकूर, अरुणकुमार ठाकूर, नरेंद्र ठाकूर, शिवाजी गाभणे, ज्ञानेश्‍वर लांभाडे, बबनराव तुपसांडे, शेख हसन, नुर अली, उध्दवराव कोठेकर, नितीन गाभणे, दशरथ पद्मने, बजरंग चंदेल, संग्रामसिह ठाकूर, सज्जनसिह ठाकूर, बापू ठाकूर, राजू गंगवाल, बाळू उखळकर, बंडू शर्मा, सी. बदलाणी, रमण वनजानी, अशोक चंदेल, राजू चंदेल, विजय ढवळे आदी शेतकर्‍यांचा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये समावेश होता. नुकसान कमीअधिक प्रमाणात असले तरी दरदिवशी हरिणाचे कळप शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर ताव मारत असल्याने उगविलेले पिक घरात येईल की नाही याबाबत शेतकर्‍यांमधून शाशंकता व्यक्त केली जात होती. शशिकलाबाई विश्‍वंभर ढवळे या महिला शेतकर्‍याच्या चार एकर शेतातील जवळपास दोन एकर सोयाबीनचे कोवळे पिक हरिणाच्या कळपाने फस्त केले होते. त्यामुळे त्या महिला शेतकर्‍यावर दूबार पेरणीची पाळी आली होती. उरलेल्या दोन एकरातील सोयाबीनही वाचेल की नाही याबाबत ढवळे साशंक होत्या. झालेल्या नुकसानीची तक्रार वाशिम येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे केली असता तक्रारकर्त्यांना तक्रार द्या, आम्ही काय करु शकतो, मिळालेली तक्रार वरिष्ठांकडे पाठवून देवून असे सांगण्यापलिकडे आजतागायत ढवळे यांच्या तक्रारीने गती घेतली नाही. त्यामुळे वनविभागाला झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पंचनामा करणेही जमत नाही का असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. एकीकडे वनविभागाच असे उत्तर अन् दूसरीकडे दिवसेंदिवस हरिणांसह वन्यप्राण्यांचा वाढता उच्छाद पाहता पावसाच्या अनियमीततेतून पिक वाचले तरी ते वन्यप्राण्यांच्या तावडीतून वाचवावे कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.