शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भागवत कथा श्रवणाने काम, क्रोध, अहंकार नष्ट होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:47 IST

श्री चरखा परिवार व गायत्री सत्संग मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे आचार्य विजय प्रकाश दायमा यांच्या वाणीतून स्थानिक ओंकारेश्वर ...

श्री चरखा परिवार व गायत्री सत्संग मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे आचार्य विजय प्रकाश दायमा यांच्या वाणीतून स्थानिक ओंकारेश्वर धाम चरखा यांच्या निवासस्थानी गुरुद्वारा रोड येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ झाला. यात भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य दायमा म्हणाले, मनुष्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे. जीवनात पाणी व वाणीचा सदुपयोग करावा, असे सांगतानाच भागवत कथा श्रवण केल्याने काम, क्रोध, अहंकार नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक श्री ओंकारेश्वर धाम येथे आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाचे मुख्य यजमान ज्योती चरखा, पप्पूभाऊ चरखा असून त्यांनी सर्वप्रथम आचार्य दायमा यांचे पूजन केले. दायमा पुढे म्हणाले, आज ठिकठिकाणी भागवत सप्ताहांचे आयोजन केले जात आहे. मात्र मनुष्याला मानसिक शांती मिळत नाही. याचे कारण मनुष्य हा भागवत कथा ऐकतो; मात्र त्याचे चिंतन, मनन, अनुसरण करीत नाही. आईवडिलांची सेवा केल्याने ईश्वराची प्राप्ती होते. मनुष्य प्राप्तीसाठी संयम, सदाचार, सेवा व स्नेह हे चार गुण अंगी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

------

दरदिवशी १२ ते ५ दरम्यान कथा वाचन

श्रीमत् भागवत कथा दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान होत आहे. शासकीय नियमांचे पालन करीत भागवत कथा वाचन होत आहे. भाविक - भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून कथा श्रवण करण्याचे आवाहन चरखा परिवार व आनंद दायमा, सत्यनारायण अग्रवाल, कचरूलाल भांगडिया, नीलेश सोमानी आदींनी केले आहे.