शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीकडे ग्रामपंचायतींची पाठ

By admin | Updated: September 4, 2014 00:18 IST

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीकडे पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. पंचायती समितीचेही दुर्लक्ष.

वाशिम : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून वृक्ष लावगड करण्याचा नियम ग्राम पंचायत प्रशासन ह्यकागदाह्णपुरताच र्मयादीत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गतवर्षी १२0 च्या आसपास तर यावर्षी जेमतेम ४0 ते ४५ ग्राम पंचायतींनीच वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविल्याची शोकांतिका आहे.शासनाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत ग्राम पंचायतींचा सहभाग बंधनकारक करण्यात आला आहे. २0१३-१४ आणि २0१४-१५ या दोन वर्षात जिल्ह्यातील ४९३ पैकी जेमतेम ११0 ते १३0 ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. चालू वर्षी वाशिम तालुका एक, मंगरुळपीर दोन, मालेगाव शून्य, रिसोड १४ असे चित्र आहे. देपुळ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून वृक्ष लावगड करण्याच्या नियमाला वाशिम पंचायत समितीसह ग्रामपंचायत प्रशासन पद्ध तीशीरपणे फाटा देत असल्याची माहिती समोर येत आहे. गतवर्षी चार आणि यावर्षी केवळ उकळीपेन या एका ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड योजनेत सहभाग नोंदविला आहे.एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लावगडीसाठी विविध उ पक्रम राबवित आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, शतकोटी वृक्ष लावगड आदींच्या माध्यमातून कोटयवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. वाशिम पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या ८४ ग्राम पंचायतीपैकी सन २0१३-१४ या वर्षामध्ये उकळीपेन ५ हजार, काजळंबा १ हजार, काटा १ हजार, आसोला जहाँगीर ३0५ या चार ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड केली आहे तर सन २0१४ -१५ या वर्षामध्ये उकळीपेन या एका ग्राम पंचायतीने २ हजार वृक्ष लागवड केली आहे तर धानोरा खुर्द व सुराळा येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत. मंगरुळपीर : मंगरुळपीर पंचायत समितींतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी ७६ पैकी २९ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. गेल्या वर्षी मंगरूळपीर पंचायत समितीला २ लाख ५0 हजारांचे उदिष्ट होते. त्यापैकी फक्त ९९ हजार १00 झाडे लावण्या त आली. २0१४-२0१५ या चालु वर्षात प्रत्येक ग्राम पंचायतीला १ हजार झाडांचे उदिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी केवळ तर्‍हाळा ग्राम पंचायतीने ५00 झाडे लावली व पारवा ग्राम पंचायतीने दोन हजार झाडे लावुन राष्ट्रीय योजनेत सहभाग घेतला आहे. वृक्ष लागवडीत सहभाग न घेणार्‍या ग्रामपंचायतींवर कारवाई होणे गरजेचे आहे.

*वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अनिश्‍चितपर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेऊन प्रत्येक ग्राम पंचायतींचा सहभाग बंधनकारक केला आहे. जिल्ह्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी यावर्षी जेमतेम ४0 ते ४५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी हा आकडा १00 च्या आसपास होता. वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी मात्र निश्‍चित नस ते. त्यामुळे जीवंत झाडांची संख्या वृक्षारोपणाच्या तुलनेत अत्यल्प असते. या पृष्ठभूमीवर वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्ठही तालुकानिहाय निश्‍चित करणे गरजेचे ठरत आहे.

*वृक्ष लागवडीबाबत पंचायत समिती प्रशासन उदासीनच!रिसोड तालुक्यात यावर्षी १४ ग्राम पंचायत प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी घसाळकर यांनी दिली. इतर पंचायत समितीच्या तुलनेत रिसोडचा आकडा जास्त आहे. मात्र, वनांखालील क्षेत्राचा विचार करता अधिकाधिक प्रमाणात ग्राम पंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतींचा आढावा घेणे आवश्यक ठरत आहे.कारंजा पंचायत समितींतर्गत येणार्‍या ग्रामपंचाय तींनीदेखील वृक्ष लागवड मोहिमेला केराची टोपली दाखविण्यातच धन्यता मानली असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीवर देखरेख ठेवणार्‍या पंचायत समिती प्रशासनाचेही याकडे थोडे दुर्लक्षच होत आहे.मालेगाव पंचायत समितींतर्गत येणार्‍या जवळपास २0 ते २५ ग्रामपंचायतींनी गतवर्षी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविला होता. २0१४-१५ या वर्षात एकाही ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविणे बंधनकारक आहे. मात्र, वरिष्ठ यंत्रणेकडून पाठपुरावा होत नसल्याने वृक्ष लागवडीचा बट्टय़ाबोळ होत आहे.