शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

४२ टक्के शेतक-यांची पीक विम्याकडे पाठ!

By admin | Updated: August 23, 2016 23:43 IST

वाशिम जिल्ह्यात २.४0 लाख शेतकरी; योजनेत प्रत्यक्ष सहभागी शेतकरी केवळ १.२९ लाख.

वाशिम, दि. २३ : दोनवेळा मुदत वाढवून देवूनही प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे जिल्ह्यातील तब्बल ४२ टक्के शेतकर्‍यांनी पाठ फिरवली. २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविल्याची बाब समोर आली आहे. राज्यशासनाच्या पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांना गत खरीप हंगामात पीकविमा मंजूर झाला होता. मात्र, पीकविम्याची रक्कम अदा करताना अनेक शेतकर्‍यांना नुकसानाच्या तुलनेत अगदीच तुटपूंजी रक्कम मिळाली. यामुळे पीकविम्याबाबत बहुतांश शेतकर्‍यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. यामुळेच की काय, यंदा तब्बल दोनवेळा मुदतवाढ देवूनही १0 ऑगस्ट या शेवटच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविण्याबाबत उत्साह दाखविला. इतर सुमारे ४0 टक्के शेतकर्‍यांनी शासनाच्या या उपक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. ह्यलीड बँकह्ण व कृषी विभागात असमन्वयाचे वातावरणपंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतीम मुदत १0 ऑगस्ट होती. त्यास सद्या १३ दिवसाचा कालावधी उलटला. असे असताना अंतीम मुदतीपर्यंत किती शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात विमा उतरविला, याची अद्ययावत माहिती कृषी विभागाकडे नाही. यासंदर्भात कृषी विभागातील संबंधिताशी चर्चा केली असता, ९४ हजार शेतकर्‍यांनी विमा उतरविल्याचे सांगण्यात आले. लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी मात्र १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला, अशी माहिती दिली. यावरून कृषी विभाग आणि लीड बँकेमध्ये विमा योजनेसंबंधी पुरते असमन्वयाचे वातावरण असल्याची बाब सिद्ध झाली. तथापि, कृषी विभागाच्या या धोरणामुळे विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी १0 ऑगस्टपर्यंत १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. संबंधितांचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे लवकरच पाठविले जाणार आहेत. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालाही माहिती पुरविण्यात आली आहे.- एस.एस.मेहताव्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम