शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

वाशिम जिल्हय़ातील १९५ भूमिहीनांना आता मिळणार जमीन

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा सुखद परिनाम.

संतोष वानखडे / वाशिम: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेने अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीनांना शेतकर्‍यांच्या पंक्तीत बसविण्याचे काम वाशिम जिल्हय़ात केले आहे. २00६ ते २0१४ या दरम्यान जिल्हय़ात ७५५ एकर जमीन उपलब्ध झाल्याने १९५ भूमिहीन लाभार्थींच्या नावावर सात-बारा तयार झाला आहे. गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीनांना दोन एकर बागायत तर चार एकर कोरडवाहू जमीन दिली जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान, तर उर्वरित ५0 टक्के रक्कम १0 वर्षांसाठी बिनव्याजी स्वरूपात दिली जाते; पात्र लाभार्थींना जमीन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला, तर लाभार्थींना जमीन दिली जाते. २00४ ते २0१४ या १0 वर्षात सहा वेळा जमीन उपलब्ध झाल्याने याचा फायदा १९५ भूमिहीन शेतकर्‍यांना झाला. चार वर्षे जमीन उपलब्धच झाली नसल्याने त्या-त्या वर्षी सदर योजना निधी असूनही ठप्पच राहिली. शासनाने प्रथम जमीन खरेदी केली आणि नंतर त्या जमिनीचे वाटप १९५ भूमिहीनांना केले. २0१४-१५ या वर्षात सदर योजनेंतर्गत ३0 एकर जमीन उपलब्ध झाल्याने प्राप्त प्रस्तावांमधून या जमिनींचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान , समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम जी वाठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या योजनेंतर्गत जमीन उपलब्ध झाल्यानंतर पात्र लाभार्थींकडून अर्ज मागविले जातात. उपलब्ध जमिनीनुसार जिल्हा निवड समिती ईश्‍वरचिठ्ठीतून लाभार्थींची निवड करते. आतापर्यंत १९५ लाभार्थींंना ७५५ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगीतले.