शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ातील १९५ भूमिहीनांना आता मिळणार जमीन

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा सुखद परिनाम.

संतोष वानखडे / वाशिम: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेने अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीनांना शेतकर्‍यांच्या पंक्तीत बसविण्याचे काम वाशिम जिल्हय़ात केले आहे. २00६ ते २0१४ या दरम्यान जिल्हय़ात ७५५ एकर जमीन उपलब्ध झाल्याने १९५ भूमिहीन लाभार्थींच्या नावावर सात-बारा तयार झाला आहे. गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीनांना दोन एकर बागायत तर चार एकर कोरडवाहू जमीन दिली जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान, तर उर्वरित ५0 टक्के रक्कम १0 वर्षांसाठी बिनव्याजी स्वरूपात दिली जाते; पात्र लाभार्थींना जमीन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला, तर लाभार्थींना जमीन दिली जाते. २00४ ते २0१४ या १0 वर्षात सहा वेळा जमीन उपलब्ध झाल्याने याचा फायदा १९५ भूमिहीन शेतकर्‍यांना झाला. चार वर्षे जमीन उपलब्धच झाली नसल्याने त्या-त्या वर्षी सदर योजना निधी असूनही ठप्पच राहिली. शासनाने प्रथम जमीन खरेदी केली आणि नंतर त्या जमिनीचे वाटप १९५ भूमिहीनांना केले. २0१४-१५ या वर्षात सदर योजनेंतर्गत ३0 एकर जमीन उपलब्ध झाल्याने प्राप्त प्रस्तावांमधून या जमिनींचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान , समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम जी वाठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या योजनेंतर्गत जमीन उपलब्ध झाल्यानंतर पात्र लाभार्थींकडून अर्ज मागविले जातात. उपलब्ध जमिनीनुसार जिल्हा निवड समिती ईश्‍वरचिठ्ठीतून लाभार्थींची निवड करते. आतापर्यंत १९५ लाभार्थींंना ७५५ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगीतले.