शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार!

By admin | Updated: December 8, 2015 02:25 IST

वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध.

वाशिम: तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा असतानाही केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जवळ पास २00 शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ३ डिसेंबरला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांना बोलावून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५४ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडुंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५३ टक्के पाणी असल्याने शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कालव्याद्वारे पाणी सोडण्यात संबंधित विभागाचे अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप अडोळी येथील नामदेव इढोळे, नारायण इढोळे आदी शे तकर्‍यांनी केला होता. खंडाळा खुर्द प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत अडोळी ग्रामसभेने यापूर्वी ठराव पारित केला; मात्र तरीही पाटबंधारे विभाग या प्रकल्पातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना चर्चेसाठी बोलाविली. आठवडाभरात पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे नामदेव इढोळे या शेतकर्‍यांनी सांगि तले.