शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार!

By admin | Updated: December 8, 2015 02:25 IST

वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध.

वाशिम: तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा असतानाही केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जवळ पास २00 शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ३ डिसेंबरला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांना बोलावून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५४ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडुंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५३ टक्के पाणी असल्याने शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कालव्याद्वारे पाणी सोडण्यात संबंधित विभागाचे अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप अडोळी येथील नामदेव इढोळे, नारायण इढोळे आदी शे तकर्‍यांनी केला होता. खंडाळा खुर्द प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत अडोळी ग्रामसभेने यापूर्वी ठराव पारित केला; मात्र तरीही पाटबंधारे विभाग या प्रकल्पातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना चर्चेसाठी बोलाविली. आठवडाभरात पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे नामदेव इढोळे या शेतकर्‍यांनी सांगि तले.