शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार!

By admin | Updated: December 8, 2015 02:25 IST

वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध.

वाशिम: तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा असतानाही केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जवळ पास २00 शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ३ डिसेंबरला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांना बोलावून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५४ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडुंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५३ टक्के पाणी असल्याने शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कालव्याद्वारे पाणी सोडण्यात संबंधित विभागाचे अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप अडोळी येथील नामदेव इढोळे, नारायण इढोळे आदी शे तकर्‍यांनी केला होता. खंडाळा खुर्द प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत अडोळी ग्रामसभेने यापूर्वी ठराव पारित केला; मात्र तरीही पाटबंधारे विभाग या प्रकल्पातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना चर्चेसाठी बोलाविली. आठवडाभरात पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे नामदेव इढोळे या शेतकर्‍यांनी सांगि तले.