शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

जलयुक्त शिवार अभियानात १५४ गावांचा समावेश !

By admin | Updated: February 25, 2016 01:50 IST

जलसंधारणाची कामे प्रस्तावित; लोकाभिमुख चेहरा देण्याचा प्रयत्न.

संतोष वानखडे / वाशिमपाणीटंचाईच्या सावटातून टंचाईग्रस्त गावांना बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २0१६-१७ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील १५४ गावांचा समावेश झाला आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना, जलसंधारणाची सुविधा निर्माण करणे, भूजल पातळीत वाढ करणे, पाणी अडवा-पाणी जिरवा आदींचा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी वाशिम जिल्ह्यातील २00 गावांचा समावेश होता. यामध्ये वाशिम २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ व कारंजा ३४ गावांचा समावेश होता. या गावांमधील जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे साहजिकच यावर्षी या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षित नाही. जलयुक्तमधील अनेक गावांचा समावेश यावर्षी पाणीटंचाई कृती आराखड्यात असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले. यावर्षी जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. वाशिम २६, रिसोड १८, मालेगाव २५, मानोरा २२, मंगरूळपीर ३१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये बंधारे बांधणे, तलावातील गाळ उपसा करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे, सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढणे, पाणी अडवा-पाणी जिरवा, ही मोहीम राबविण्यासोबतच विविध कामे केली जाणार आहेत.