शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

वाळूंचे ढिगारे देतात अपघातास आमंत्रण

By admin | Updated: June 7, 2014 22:29 IST

बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून,

कारंजालाड : बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून, रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.अतिशय वर्दळीचे व गजबजलेले शहर म्हणून कारंजाचा उल्लेख होतो. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्याही वाढत असल्याने रहदारीसाठी शहरातील मुख्य रस्ते अरूंद पडू लागले आहेत. आधुनिकीकरणामुळे जुनी दुकाने पाडून त्याऐवजी नवी दुकाने व कॉम्प्लेक्स उभारणीची कामेही शहरात होत आहेत. या बांधकामासाठी वाळू आणि गिट्टीचा मोठय़ा प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. मात्र बांधकाम करीत असताना वाळू आणि गिट्टी सर्रासपणे रहदारीच्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील नविन बसस्थानक ते डॉ.आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक ते इंदिरा गांधी चौक, जयस्तंभ चौक ते सिंधी कॅम्प, रामासावजी चौक ते पोहा वेश या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर नवीन घर, दुकान आणि कॉम्प्लेक्स उभारणीची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र रहदारीच्या रस्त्यावरच पडून असल्याचे दिसून येते. परिणामी रस्ता अरूंद होवून रहदारीला अडथळा येतो. तसेच वाळूंवरून मोटारसायकल घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहे. वाळूंच्या ढिगार्‍यामुळे आजवर शहरात अनेक अपघात घडले आहेत. कॉम्प्लेक्स आणि घर उभारणीचे काम पूर्ण होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. हे काम पूर्ण होईपर्यंत या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र बिनदिक्कतपणे रस्त्याच्या कडेला पडून राहते. दिवसभर या रस्त्यावरून वाहने जात असल्याने वाळू संपूर्ण रस्त्यावर पसरत असून त्यावरून मोटारसायकल घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. सूचनेनंतरही वाळू रस्त्यावर टाकली जात असल्याने नगर परिषदेला निर्देशाला ह्यठेंगाह्ण लावला जात आहे.

** वाळूंच्या ढिगार्‍यामुळे होतात ह्यराडेह्ण

घर बांधणीचे कामे शहरातील प्रत्येक प्रभाग अथवा ग्रामपंचायतच्या अखत्यारित सुरू आहेत. घराचे बांधकाम करताना वाळू रस्त्यावर साठविल्या जात असल्याने ह्यराडाह्ण होत आहे.वाळू आणि गिट्टीमुळे रहदारीला खोळंबा होत असल्याने वाद विकोपाला जात आहे. याशिवाय लहान मुले-मुली वाळूंवर खेळत असल्याने रेती दूरपर्यंत पसरत जाते. घर पुनर्रबांधणीचे काम करताना कंत्राटदार स्वत:च्या सोयीसाठी जाणीवपूर्वक बांधकामस्थळाजवळ वाळू व गिट्टी साठवून ठेवतो. परिणामी भांडणाला तोंड फुटते. वाळू आणि गिट्टीच्या सभोवताल विटांचा मोठा थर लावल्यास ते रस्त्यावर पसरणार नाही. परिणामी अपघातास आळा बसू शकतो.