शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भूसंपादनाची प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश

By admin | Updated: July 17, 2015 02:01 IST

भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास न गेल्याने वाशिम जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांची कामे रखडली.

वाशिम : भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास न गेल्याने जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प व इतर विकास प्रकल्पांची कामे रखडली आहे. त्यामुळे भूसंपादनाची सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांना दिल्या. पळसखेड व मिझार्पूर लघु प्रकल्प व इतर सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादन व पुनर्वसनविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात १६ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रभारी उपायुक्त ओ. आर. अग्रवाल, जिल्हा भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी बिबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, राजेश पारनाईक, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गायकवाड, भूमीअभिलेखचे जिल्हा अधीक्षक एस. डी. लाखाडे, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, पवार, रिसोडचे उपअधीक्षक भूमिअभिलेख विजय सवडकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच इतर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाही गती द्यावी. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. प्रभारी उपायुक्त अग्रवाल म्हणाले की, पळसखेड व मिझार्पूर प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करावा.