शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

वन्य प्राण्यांवर नियंत्रणासाठी शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:28 IST

वाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्‍या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील प्रकार पंख्याचे पाते वापरून बनविले आवाज करणारे यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्‍या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.  रोही, रानडुक्कर, हरीण, माकडे आदी वन्य प्राणी शेतशिवारात धुमाकूळ घालून पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या वन्य प्राण्यांना मारताही येत नाही. त्यातच रानडुकरांसारखे प्राणी, तर शेतकर्‍यांवरच हल्ले करतात. त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न अनेक शेतकर्‍यांना सतावत आहे. यावर एक नामी उपाय मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी शोधला आहे. शेतकर्‍यांनी त्यासाठी एक आवाज काढणारे आणि हवेच्या आधारे फिरणारे यंत्रच तयार केले आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते सायकलमधील रिंगच्या बेअरिंगला फिट करून त्या बेअरिंगच्या दुसर्‍या बाजूने एक लोखंडी पट्टी फिट केली. त्या पट्टीच्या दोन्ही टोकांवर साखळीचे सहज वेडेवाकडे होणारे तुकडे लावले, हे वार्‍याने फिरणारे यंत्र एका लाकडी खांबावर बसवून. त्याच खांबावर पंख्याच्या मागील बाजूस लोखंडी पट्टीवर बसविले व साखळीचे तुकडे सहज आदळतील अशा अंदाजाने स्टिलच्या धातूचे ताटही बसविले. वारा जोरात वाहू लागला की कुलरचे पाते फिरायला लागते आणि त्यासोबत मागील बाजूस बसविलेली लोखंडी पट्टी फिरून त्या पट्टीच्या दोन्ही टोकावर लावलेल्या साखळय़ा ताटावर आदळत राहतात. त्यामुळे सतत आवाज होत राहतो. हा आवाज होत असल्याने शेतात कोणी असल्याचा भास प्राणी आणि पक्ष्यांना होतो. परिणामी ते शेताच्या आसपासही फिरकत नाहीत. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथील शेतकरी शशिकांत गहुले आणि मानोली येथील शेतकरी मनोहर महाकाळ यांच्यासह शिवारातील अनेक शेतकर्‍यांनी या यंत्राचा वापर सुरू केला आहे.