शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने ...

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यासोबतच उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या, असे निर्देश दिले.

राजस्थान येथून उंटांची तस्करी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. उंट चोरी करून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जातात. मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून सहा उंटांचा कळप घेऊन महू येथील योगेश हुकमचंद प्रजापती व मुखेड, जिल्हा नांदेड येथील भीमराव बुद्धू राठोड हे दोघेजण रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास अमरावती - हैद्राबाद महामार्गावरून कारंजा ते मंगरूळपीरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती जाणून घेतली. यावेळी संबंधित दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, मध्यप्रदेशातील महू येथून परतवाडा जंगलमार्गे कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग, खंडाळा व यवतमाळच्या सीमा भागातून छुप्या व आडमार्गाने पायी प्रवास करत थेट हैद्राबाद येथील कत्तलखान्यात उंटांची रवानगी करण्यात येते व कत्तलीनंतर मांस व कातड्याचीही विक्री केली जाते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताना सर्व संबंधित ठाणेदारांना कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.

.................

बॉक्स :

दोन वर्षांपूर्वी झाली होती कारवाई

दोन वर्षांपूर्वी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातूर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटांचा कळप अडवून पातूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावरून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही १७ डिसेंबर २०१९ रोजी सुमारे २५ ते ३० च्या संख्येत उंटांचा कळप वाशिम शहरातून रात्रीच्या वेळी हिंगोलीच्या दिशेने रवाना होऊन तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गेल्याची माहिती आहे आणि आता १४ मार्च रोजी दोघेजण सहा उंटांसह मार्गक्रमण करताना आढळून आले आहेत.

...............

बॉक्स :

आंध्रात गेलेले उंट परतलेच नाहीत

राजस्थान येथून दरवर्षी शेकडोंच्या संख्येत उंटांचे कळप महाराष्ट्रातील विदर्भातून आंध्रप्रदेशात नेले जातात. मात्र, मागील ५० वर्षांपासून दक्षिणेकडे गेलेले लाखोंच्या संख्येतील उंट परतीचा प्रवास करून राजस्थानात जाताना कधीच आढळले नाहीत. त्यामुळे उंटांची तस्करी करून कत्तल केली जात असल्याचे स्पष्ट होते. आता उंट चोरट्यांनी आपला मार्ग बदलून अकोला जिल्ह्यातील पातूरमार्गे न येता परतवाडा, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग या रस्त्याने जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.