शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अतिवृष्टीमुळे खचलेल्या पुलाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST

वाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे पूल खचले आहेत. त्यात काही पूल पूर्णपणे खचल्याने वाहतुकीला अडथळा ...

वाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे पूल खचले आहेत. त्यात काही पूल पूर्णपणे खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि वाशिम तालुक्यातील देपूळसह इतर पुलांचा समावेश आहे. हे पूल दुर्लक्षित असल्याने शेतकरी, वाहनचालकांना अडचणी येत असल्याने ते पूल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहॉगिर ते देपूळ रस्त्यादरम्यानच्या नाल्यावरील पूल खचला. यामुळे या रस्त्याची वाहतूक बंद झाली असून, शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडण्यासह इतर अडचणीही त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. तेव्हा या पुलाचे नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी जि. प. सदस्य अर्चना डिगांबर खोरणे यांनी सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे गत महिन्यात निवेदनाद्वारे केली. शिवाय मानोरा तालुक्यातील इंझोरी-पिंपळगाव रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी पावसामुळे पूर्णपणे खचला असल्याने ३५ शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.