...............
एकूण विद्यार्थी संख्या
दहावीचे विद्यार्थी - १९१९१
बारावीचे विद्यार्थी - १७३४६
.........
पास झालेले विद्यार्थी
दहावीचे - १९१८८
बारावीचे - १७३४१
...................
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा झालीच नाही; तर अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
निकालाची एकूण टक्केवारी जोरदार आहे; मात्र मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे? असा प्रश्न अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित करीत आहेत.
..............
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...
माझा मुलगा आधीपासूनच शाळेत हुशार आहे. त्याला आतापर्यंत प्रत्येक इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळत आले. दहावीची परीक्षा झाली असती तर त्यातही अपेक्षेनुरूप गुण मिळाले असते; मात्र तो शिकत असलेल्या शाळेने दिलेले गुण फारच कमी आहेत. त्यामुळे नाराजी झालो.
- विनोद डोंगरे
.....................
इयत्ता दहावीला फारसे महत्त्व राहिलेले नाही. असे असले तरी पुढच्या शिक्षणासाठी हे वर्ष ‘टर्निंग पाॅईंट’ म्हणून ओळखले जाते. शाळेतील काही शिक्षकांनी मात्र भेदभाव करून मुलाला हेतुपुरस्सर कमी गुण दिले, त्यांची कुवत नाही, त्यांना परीक्षेत अधिक गुण मिळाले. हा एकप्रकारे अन्याय आहे.
- शरद मनवर
.......................
विद्यार्थी म्हणतात...
वर्गातील हुशार मुलांपैकी मी एक आहे. दहावीच्या परीक्षेची कसून तयारी केली होती; मात्र कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. जाहीर झालेल्या निकालात शाळेकडून देण्यात आलेले गुण तुलनेने खूपच कमी आहेत. जे माझे मित्र हुशार नव्हते, त्यांना माझ्यापेक्षा अधिक गुण मिळाले.
- हर्षल मनवर
.....................
मी इयत्ता आठवीपासूनच दहावीच्या परीक्षेत वर्गात सर्वाधिक गुण मिळवायचे, असा निर्धार केला होता. त्यानुसार नियोजन करून खूप अभ्यासदेखील केला; मात्र कोरोनामुळे दहावीची परीक्षाच झाली नाही. शाळेने जाहीर केलेल्या निकालात हुशार नसलेल्या मित्रांपेक्षा मला कमी गुण देण्यात आले.
- शिवम डोंगरे