शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

५२५ गावांत दुष्काळी सवलतीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

वाशिम : विभागीय आयुक्तांनी खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यात वाशिम जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ...

वाशिम : विभागीय आयुक्तांनी खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यात वाशिम जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४९ इतकी आली असून, जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. आता ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या तालुक्यात दुष्काळी सवलतीच्या आशा निर्माण झाल्या असल्या तरी दुष्काळाबाबतचे निकष अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

विभागीय महसूल आयुक्तांनी सन २०२०-२१ मधील प्रमुख खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण ७९३ गावांपैकी २६८ गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे, तर ५२५ गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४९ पैसे इतकी आहे. जिल्ह्याच्या अंतिम खरीप पैसेवारीनुसार वाशिम तालुक्यातील १३१ गावांची अंतिम पैसेवारी ५५ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची अंतिम पैसेवारी ४४ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची अंतिम पैसेवारी ५३ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ५२५ गावांना दुष्काळी सवलतीची आशा असली तरी, प्रत्यक्ष कोणत्या गावांत पावसाचा खंड किती होता, पिकांचे नुकसान किती झाले, उत्पादनावर काय परिणाम झाला, या सर्व बाबींची पडताळणी करूनच दुष्काळी सवलती लागू करण्याबाबत निर्णय घेता येणार आहे.

------

दुष्काळी गावातील सवलती

कृषी पंप वीज बिल आकारणीत सवलत द्यावी. वीजजोडणी खंडित न करणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, तहसीलदारांनी दुष्काळी भागात विविध सुविधांच्या प्रस्तावाची शहानिशा, करण्यासह शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाऊ शकतो.