शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सुट्या संपल्या, चिमुकले पुन्हा ‘ऑनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ...

दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवले. त्यानंतर काहीच दिवसांत सर्वच ठिकाणच्या शाळा बंद करण्याचे फर्मान शासनस्तरावरून सुटले. २०२०-२१ चे नवे शैक्षणिक सत्र यामुळे सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन लाटानंतर आता तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: या लाटेत लहान मुले बाधित होतील, असे संकेत आहेत. त्यामुळेच २०२१-२२ चे नवे शैक्षणिक सत्रही सुरू होण्याबाबत अद्यापपर्यंत शासनस्तरावरून कुठलीही ठोस हालचाल झालेली नाही.

दुसरीकडे शासकीय शाळांप्रमाणेच खासगी शाळांनीही २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन शिक्षण पुरविले. उन्हाळी सुटी संपल्यानंतर नव्या शैक्षणिक सत्रालाही ऑनलाईन पद्धतीनेच सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी मोबाईल, लॅपटाॅप, संगणकांवरून ऑनलाईन क्लासेस करण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे.

..........................

यंदाही वाजणार नाही शाळांची घंटा

जिल्ह्यात शासकीय आणि खासगी स्वरूपातील पहिली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या एकूण १३७८ शाळा आहेत. त्यातील खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे; मात्र जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत; मात्र दहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. इतर वर्गशिक्षकांसाठी हे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे.

......................

मोफत पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

यंदाही ऑनलाईन पद्धतीनेच नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे; मात्र अद्यापपर्यंत शासनस्तरावरून पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. ती कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना लागून आहे.