शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सर्वाेच्च सन्मान ‘पद्मश्री’ने लिखाणाची जबाबदारी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST

वाशिम : १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राघववेळ’ या गाजलेल्या कादंबरीला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘मोराचे ...

वाशिम : १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राघववेळ’ या गाजलेल्या कादंबरीला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘मोराचे पाय’, ‘ऊन सावली’, ‘सांजरंग’ या नावाने एकाहून एक सरस अशा कादंबऱ्या प्रकाशित होत गेल्या. २१ पुस्तके, प्रकाशित पुस्तकांमध्ये ८ कादंबऱ्या, ४ कवितासंग्रह, २ कथासंग्रह, २ ललित लेख, एक चरित्र, एक भाषण, एक समीक्षा, अशा विविधांगी ग्रंथसंपदेचे रचयिता वाशिम येथील प्रसिद्ध साहित्यिक नारायण चंद्रभान कांबळे यांना देशातील सर्वोच्च समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यायोगे वाशिमच्या साहित्यक्षेत्रात सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. यानिमित्त ना.चं. कांबळे यांच्याशी साधलेला हा संवाद.

तुमच्या जीवन प्रवासाविषयी काय सांगाल?

माझा जन्म जैनांची काशी शिरपूर जैन येथे चंद्रभान आणि भुलाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे लहानपण अठराविश्व दारिद्र्यातच गेले. अशाही स्थितीत शिक्षण घेत राहिलो. कालांतराने गावातच चौकीदाराची नोकरी लागली आणि यामुळे थोडीफार परिस्थितीही सुधारली. बी.ए., डी.एड. पूर्ण केल्यानंतर वाशिम येथे रा.ल. कन्या शाळेत १९७५ मध्ये वॉचमन आणि त्यानंतर १९७७ मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली. १९७१ मध्ये लग्न झाले. लग्नापूर्वी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने जीवनात नैराश्य आले. त्यातूनच कविता रचायला सुरुवात केली. सोबतच कथा, कादंबरी, ललित, भाषणांवर लेखणी झिजवत पुढचा प्रवास सुरू केला. कलावंत असो अथवा साहित्यिक दोघेही दरिद्रीच असतात, याचा अनुभव वेळोवेळी येत राहिला. परंतु, त्यातूनच आगळीवेगळी कलाकृती जन्माला आणणे शक्य झाले.

तुम्हाला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी मिळाली; तर २५ वर्षांनंतर सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ जाहीर झाला, याबाबत आपली प्रतिक्रिया काय?

माझ्या ‘राघववेळ’ या कादंबरीला डिसेंबर १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी मी साहित्यक्षेत्रात नवखाच असल्याने तो माझ्यासाठी अनपेक्षित धक्का होता. कारण, स्पर्धेत कसलेल्या गंगाधर गाडगीळ यांचे ‘एका मुंगीचे महाभारत’ आणि सुनीता देशपांडे ‘आहे मनोहर तरी’ ही पुस्तके होती. साहित्य अकादमी पुरस्कार हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण होता; तर आता थेट पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे माझ्या साहित्यव्रताचे खऱ्या अर्थाने चीज झाले, असेच मी म्हणेन.

तुमच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्या, कथासंग्रहांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?

‘राघववेळ’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार, ह. ना आपटे, बा. सी. मर्ढेकर, ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, ‘ऊन सावली’ला वि. स. खांडेकर पुरस्कार मिळाला आहे. यासह सांजरंग, मोराचे पाय आणि कृष्णार्पण या कादंबऱ्यांनाही विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘राघववेळ’चा बंगाली अनुवाद ‘रघबेर दिनराज’ २००९ मध्ये प्रकाशित झाला. त्याला २०११-१२ मध्ये साहित्य अकादमी मिळाली. १९९५ मध्ये ‘राघववेळ’ला; तर १९९६ मध्ये ‘ऊन सावली’ला राज्य पुरस्कार मिळाला. याशिवाय संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराने आतापर्यंत मला सन्मानित करण्यात आले आहे.