शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसासह गारपीट; शेकडो एकरातील रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:31 IST

जिल्ह्यात गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यानंतर उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे रब्बी पिकांचे उत्पन्न घेण्याची ...

जिल्ह्यात गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यानंतर उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे रब्बी पिकांचे उत्पन्न घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली. विविध संकटातून ही पिके सावरत आता काढणीवर आली असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरातील गहू आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी झाली असून, ५७ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याची काढणी केली असली तरी, निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसला. शिवाय ३० टक्के क्षेत्रातील हरभरा पिकही काढणीवर असताना या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

-----------

कारंजा-मानोऱ्यात अधिक नुकसान

जिल्ह्यात गुरुवारी विविध भागांत अवकाळी पाऊस पडला. त्यात कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातच पिकांना फटका देणारा पाऊस पडल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात, तर काही ठिकाणी गारपिटही झाल्याची माहिती असून, या पीक नुकसानीची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

-------

कोट: आमच्या शेतात १० एकर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी केली आहे. हे पीक काढणीवर येत असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीची पाहणी प्रशासनाने करावी, अशी आमची मागणी आहे.

निशा आसावा,

शेतकरी , इंझोरी

-----------

कोट: लागोपाठच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बेजार झाला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती; परंतु अवकाळी पावसाने पुन्हा घात केला आणि काढणीवर आलेले गहू पीक हातून गेले. प्रशासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.

-नितीन उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

पीक क्षेत्र (हेक्टर)

हरभरा ५७२०२

गहू २९४०५

करडी ३३१

मका २९६

इतर तेलबिया १४१