शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

अवकाळी पावसासह गारपीट; शेकडो एकरातील रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:31 IST

जिल्ह्यात गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यानंतर उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे रब्बी पिकांचे उत्पन्न घेण्याची ...

जिल्ह्यात गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यानंतर उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे रब्बी पिकांचे उत्पन्न घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली. विविध संकटातून ही पिके सावरत आता काढणीवर आली असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरातील गहू आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी झाली असून, ५७ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याची काढणी केली असली तरी, निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसला. शिवाय ३० टक्के क्षेत्रातील हरभरा पिकही काढणीवर असताना या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

-----------

कारंजा-मानोऱ्यात अधिक नुकसान

जिल्ह्यात गुरुवारी विविध भागांत अवकाळी पाऊस पडला. त्यात कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातच पिकांना फटका देणारा पाऊस पडल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात, तर काही ठिकाणी गारपिटही झाल्याची माहिती असून, या पीक नुकसानीची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

-------

कोट: आमच्या शेतात १० एकर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी केली आहे. हे पीक काढणीवर येत असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीची पाहणी प्रशासनाने करावी, अशी आमची मागणी आहे.

निशा आसावा,

शेतकरी , इंझोरी

-----------

कोट: लागोपाठच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बेजार झाला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती; परंतु अवकाळी पावसाने पुन्हा घात केला आणि काढणीवर आलेले गहू पीक हातून गेले. प्रशासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.

-नितीन उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

पीक क्षेत्र (हेक्टर)

हरभरा ५७२०२

गहू २९४०५

करडी ३३१

मका २९६

इतर तेलबिया १४१