शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राठी महाविद्यालयात हरितशपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री ...

राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री धुमाळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. चिमणे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखणे, ही प्रत्येकच व्यक्तीची जबाबदारी आहे. केवळ प्रसंगानुसार कार्य करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यातील स्थितीचा विचार करता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, धूरमुक्त पर्यावरणासाठी विविध संकल्पनांचा अभ्यास अंगिकारावा, रेनवॉटर हार्वेस्टिंग करून भूजलवाढीचे प्रयत्नही विद्यार्थ्यांनी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मिलिंद कांबळे या विद्यार्थ्यानेही पर्यावरणाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सागर सोनी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश खंदारे यांनी, तर आभार प्रदर्शन कविता मांगुळकर हिने केले. कार्यक्रमासाठी प्रा. संजय इढोळे, महादेव सोमाणी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.